शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "कुणी भगवान गडावर गेले म्हणून...", शिंदे गटातील नेत्याने धनंजय मुंडेंबाबत स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:08 IST

Maharashtra Politics : मंत्री धनंजय मुंडे यांनी काल बीड येथील भगवान गडावर भेट दिली, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (३० जानेवारी) भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे हा खंडणी घेणारा माणूस नाही असं भाष्य केले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

“धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे

धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवान गड आहे असं विधान नामदेव शास्त्री यांनी केले, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, आम्हाला हे पटत नाही. हे अपेक्षित नाही. यावर आज शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, धनंजय मुंडे भगवान गडावर गेले हे चांगलच आहे. एखाद्या संतांच्या सानिध्यात जाणे याचा राजकीय संबंध लावणे काही कारण नाही,कोण भगवान गडावर गेले, कुणी कुठेही गेले यावर आक्षप घेणे चुकीचे आहे, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. 

यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिरसाट म्हणाले, ज्या लोकांनी मुंबईची वाट लावली ते लोक आज भ्रष्टाचारावर बोलत आहेत. सत्ता भोगताना जे घोटाळे केले आहेत.  त्याचे आता पुरावे समोर येत आहेत, असंही शिरसाट म्हणाले. सगळे सामंत आमच्यासोबत आहेत. आता एकनाथ शिंदेंच ऑपरेशन करणार आहेत. या लोकांना लोकांच्या घरात पाहायची सवय लागली आहे. आम्हाला घरात बसून राजकारण करायचे नाही. बाहेर जाऊन काम करत आहे, असा टोलाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला.

पालकमंत्रिपदाचा तिढा राहिलेला नाही

पालतमंत्रिपदाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, पालकमंत्रिपदाचा तिढा आता राहिलेला नाही. ज्या दोन जागांवर तिढा सुरू आहे. त्यावर आज पडदा पडेल. पालकमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो हे म्हणणे चुकीचे आहे. विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहे, असंही शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटDhananjay Mundeधनंजय मुंडे