शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

By संतोष कनमुसे | Updated: June 8, 2025 19:28 IST

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाष्य केले. यावर आता आमदार नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महाराष्ट्र विधासभा निवडणूक प्रक्रियेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले.  गांधी यांनी या आधीही या निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ( शनिवारी ७ जून) रोजी गांधी यांना प्रत्युत्तर दिले. "महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे", असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, आता काँग्रेस आमदार नाना पटोल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात

आज पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचे लेख माध्यमात प्रसिद्ध झाले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाल्याचे म्हटले होते. याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे होते. पण, भाजपाचेच अंधभक्त ज्यांनी लोकशाहीचा घात केला. लोकशाहीचा खून केला. ज्यांनी जनतेशी बेईमानी करुन सत्तेत बसले आहेत ते राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

"राहुल गांधी यांचा लोकशाही वाचली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. पण लोकशाहीला संपवण्याचं काम केंद्रातील सरकार करत आहे. आज आमचे मित्र फडणवीस यांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेत आहेत. "माझा फडणवीस यांना प्रश्न आहे, पहिल्या अधिवेशनावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर फडणवीस यांनी का द्यावे?", असा सवालही नाना पटोले यांनी केला.

'आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय' 

"जी ४६ लाख मतं वाढली आहेत. ती कोण आहेत? आम्ही याबाबत पुरावे दिली आहेत. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे. निवडणूक आयोग माध्यमांसमोर का आले नाहीत. ट्विटच्या माध्यमातून आकडेवारी त्यांनी दिली. आम्ही निवडणूक आयोगाला फुटेज मागितले. यावर आयोगाने फुटेज देत येत नाही असा जावई शोध काढला. यामुळे आता आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्ट आम्हाला सहकार्य करेल ही आमची अपेक्षा आहे, असंही पटोले म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा