शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:42 IST

राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे

PM Narendra Modi : राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले. आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत, अशी टीका एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दुसरीकडे आता, कोलकात्याप्रमाणे मुंबईला उद्ध्वस्त होऊ देता येणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईला स्थिर सरकारसोबत भक्कमपणे पुढे जाण्याची गरज आहे. एकेकाळी देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या पण राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असे मोदी म्हणाले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

न्यूज १८ दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरहं भाष्य केलं. “बंगाल उद्ध्वस्त झाला आहे. कोलकाता एकेकाळी आर्थिक विकासात अग्रेसर होते. पण राजकारणाने ते उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्राने त्या वाटेने जाऊ नये. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशहितासाठी महाराष्ट्रात भक्कमपणे पुढे जायला हवे. ही भावना आम्ही महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही त्यांना पटवून देत आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रातील लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वीही अस्थिर परिस्थिती होती.पण महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून युतीची सरकारे दिसत आहेत आणि काही काळापासून एकही मुख्यमंत्री ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही.इथे विलासराव देशमुख होते. शरद पवार देखील इथे मुख्यमंत्री होते. पण पूर्ण बहुमत असतानाही त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.महत्त्वाचे म्हणजे,गेल्या काही काळापासून एकाही मुख्यमंत्र्याला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. बऱ्याच कालावधीनंतर आपला कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती होते. तेव्हाचे सरकार स्वच्छ आणि निष्कलंक होते. जनतेच्या हिताचे काम करणारे सरकार होते,” असेही पंतप्रधान म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी युतीशी गद्दारी केली

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी युती तोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील फरकही सांगितला. "ज्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, ज्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेकडे मते मागितली त्यांचा मुख्यमंत्री होण्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे अहंकार वाढला.आपल्या अहंकार आणि महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या युतीशी गद्दारी केली. लोकांमध्ये याचा राग आहे आणि भाजपबद्दल सहानुभूती आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

यंदा आमच्या बाजूने सहानुभूती आहे - पंतप्रधान मोदी

“भाजपने महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे. काही लोकांना वाटले की आम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे.पण  नाही.आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ शकलो असतो पण तसे केले नाही. आम्ही स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी जगतो हे आम्ही महाराष्ट्रातील जनतेला पटवून दिले. या निवडणुकीत ही सहानुभूती आमच्या बाजूने आहे कारण एवढ्या मोठ्या पक्षात यशस्वी असलेला मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहे.महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आपला स्वाभिमान एकप्रकारे बाजूला टाकला आहे,” असंही मोदींनी म्हटलं.

शरद पवारांच्या घरात कौटुंबिक वाद

“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवसेना किंवा राष्ट्रवादीतील वादळावरून हे स्पष्ट झालं की, जेव्हा तुम्ही इतर नेत्यांपेक्षा केवळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांना महत्त्व देता तेव्हा काय होते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात.  मुलीने किंवा पुतण्याने पक्षाची धुरा सांभाळावी हा शरद पवारांच्या घरातील वाद हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे. सक्षम नेत्याला नेतृत्व द्यायचे की मुलाला हे काँग्रेसप्रमाणे शिवसेनेतही सुरु आहे,” असं मोदींनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे