शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:41 IST

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या भेटीगाठींवरून थेट टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 'कारपेट' सोडले नाही. सततच्या पराभवानंतर त्यांना लोकांमध्ये जावे लागत असल्याची जाणीव झाली. म्हणूनच ते घराबाहेर पडले आहेत,असा टोला फडणवीसांनी लगावला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांनावर संकट आले होते, त्यावेळेस ते कारपेटवरून खाली उतरले नव्हते. आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आले आहे की, लोकांमध्ये जावा लागते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहिती आहे की, हे लोक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी आलेले आहेत. त्यांना जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणून लोक पकडून आणण्याचे काम त्याठिकाणी सुरू आहे,' अशीही त्यांनी टीका केली.

शेतकऱ्यांच्या मदत पॅकेजबाबत बोलताना फडणवीस यांनी सरकारी उपाययोजनांचा बचाव केला, तसेच विलंबाचे कारणही स्पष्ट केले. "सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. हे खरं आहे की, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पॅकेज पोहोचले नाही, त्यामुळे त्यांच्यात संभ्रम आहे. पण, आरबीआयच्या नियमानुसार दररोज ६०० कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय, उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही फसवणूक असल्याचे म्हटले. "राज्य सरकारकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेले सर्वांत मोठे पॅकेज नाही, तर शेतकऱ्यांना दिलेला आजवरचा सर्वांत मोठा दगा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती दिली पाहिजे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र, ती मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने सरकारचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी मी आलो आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis Slams Thackeray: No Carpet Abandoned Then, Futile Efforts Now!

Web Summary : Fadnavis criticized Thackeray's farmer outreach, stating he ignored farmers as CM. Now, facing electoral defeats, he's pretending concern. Fadnavis defended government aid, citing RBI regulations for payment delays. Thackeray, touring Marathwada, claims government aid is a betrayal to farmers.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण