शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

“उद्धव ठाकरेंनी सांगितले तर ७व्या मजल्यावरुनही उडी मारु”, असं म्हणणारे आमदार ‘नॉट रिचेबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:04 IST

उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल, असे ठणकावून सांगणारे शिवसेनेचे कट्टर आमदार एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले आहेत.

मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू असं म्हणणारे शिवसेनेचे एक कट्टर आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. 

विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जाणारे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू असे म्हणणारे पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेत. 

उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास ७व्या मजल्यावरून उडी मारु

तत्पूर्वी, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती.  

एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र 

एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आमचा संपर्क सर्व पक्षातील नेत्यांशी होता. राज्यसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीतही सर्व पक्षांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेतील नाराजीचे चित्र उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दिसू शकेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यसभेत भाजपने उभे केलेले तीनही उमेदवार निवडून आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही पाचही उमेदवार निवडून आले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्षपणाचा उत्तम नमूना आहे. आम्हाला मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे