शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“उद्धव ठाकरेंनी सांगितले तर ७व्या मजल्यावरुनही उडी मारु”, असं म्हणणारे आमदार ‘नॉट रिचेबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:04 IST

उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल, असे ठणकावून सांगणारे शिवसेनेचे कट्टर आमदार एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले आहेत.

मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू असं म्हणणारे शिवसेनेचे एक कट्टर आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. 

विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जाणारे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू असे म्हणणारे पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेत. 

उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास ७व्या मजल्यावरून उडी मारु

तत्पूर्वी, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती.  

एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र 

एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आमचा संपर्क सर्व पक्षातील नेत्यांशी होता. राज्यसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीतही सर्व पक्षांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेतील नाराजीचे चित्र उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दिसू शकेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यसभेत भाजपने उभे केलेले तीनही उमेदवार निवडून आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही पाचही उमेदवार निवडून आले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्षपणाचा उत्तम नमूना आहे. आम्हाला मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे