शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:59 IST

या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत धुसफूस असल्याचं समोर येत होते. गृहमंत्र्यांच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याचंही बोललं जात होते. तर विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही झाला नाही त्यामुळे काँग्रेसही नाराज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशी सूत्रांची माहिती आहे.

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेते यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गृहखाते शिवसेनेने घ्यावं अशी मागणी सेना नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. त्यामुळे गृहखात्याची अदला-बदल होणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

८ एप्रिलला राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित असतील. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मागील २ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भास्कर जाधव हे सभागृह चांगल्या प्रकारे चालवू शकतात असं काहींचे म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे घेऊन त्याबदल्यात एखादं मंत्रिपद काँग्रेसला देता येईल का यावरही बैठकीत चाचपणी केली जाईल.

अलीकडेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे वृत्त फेटाळून लावले. मात्र गृह खाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशी मागणी शिवसेना नेते करत आहेत. त्यातच निधी वाटपावरूनही महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेना, काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मध्यंतरी २५ आमदार नाराज असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या सर्व विसंवादाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस