शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"मोठ्या मनानं देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:18 IST

५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला अखेर मोठा ट्विस्ट मिळाला आहे. भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली.

राजभवनात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे पाठबळ आहे. ५० आमदार एकत्र आहोत. अडीच वर्षापूर्वी काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. या काळात आम्ही मतदारसंघातील कामे, अडचणी याबाबत वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. परंतु आमदारांमध्ये असलेली खदखद, मतदारसंघातील प्रश्न आणि पुढच्या निवडणुकीत लढवणं आणि जिंकणे ही समस्या सांगितले. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येणाऱ्या आमदारांची संख्या पाहता आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती. महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते. मर्यादा येत होत्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच हा वेगळा निर्णय राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. जे काही घडले जी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करू. या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याचं काम करू. इतक्या मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. आत्ताच्या राजकारणात काय होईल हे पाहता. परंतु संख्याबळ असताना पद दुसऱ्याला देणं हा त्याग आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, ५० आमदारांमध्ये काही मंत्री आहेत. आपापल्या मतदारसंघात ताकदवान आहे. एकीकडे खूप मोठे नेते आहे. एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. ५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमदारांनी केले. या आमदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊन देणार नाही. आता आपली ताकद वाढली आहे. मजबूत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल. हे सरकार लोकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा