शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:04 IST

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत.

मुंबई-

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात ते खुलेआम बोलतात कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि अफवा पसरवू नये, असं एका शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे. 

पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती माध्यमांमध्ये दिली जात होती. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सूरतला रवाना झाले त्या दिवशी म्हणजेच २१ जून रोजी ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आणखी एकदा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली असाही दावा करण्यात येत आहे. पण यात वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे.

आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत- मुनगंटीवार"राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण सध्या आम्ही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही", असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

२० हून अधिक आमदार संपर्कात- अनिल देसाईशिवसेना नेते अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे गटातील २० हून अधिक आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. देसाई यांच्यानंतर संजय राऊत यांनीही आज प्रसार माध्यमांशी बोलताना आम्ही आजही गुवाहटीमधील काही आमदारंना बंडखोर मानत नाही. ते मुंबईत परतल्यावर सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असा दावा संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे