शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:04 IST

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत.

मुंबई-

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात ते खुलेआम बोलतात कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि अफवा पसरवू नये, असं एका शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे. 

पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती माध्यमांमध्ये दिली जात होती. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सूरतला रवाना झाले त्या दिवशी म्हणजेच २१ जून रोजी ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आणखी एकदा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली असाही दावा करण्यात येत आहे. पण यात वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे.

आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत- मुनगंटीवार"राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण सध्या आम्ही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही", असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

२० हून अधिक आमदार संपर्कात- अनिल देसाईशिवसेना नेते अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे गटातील २० हून अधिक आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. देसाई यांच्यानंतर संजय राऊत यांनीही आज प्रसार माध्यमांशी बोलताना आम्ही आजही गुवाहटीमधील काही आमदारंना बंडखोर मानत नाही. ते मुंबईत परतल्यावर सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असा दावा संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे