शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:38 IST

सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले

Bhagat Singh Koshyari Reaction, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल सुनावला. आजच्या निकालातील ठळक वैशिष्ट्ये सांगताना, सुप्रीम कोर्टाने राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन अविश्वास प्रस्तावाचे पत्र दिले असले तरी राज्यपालांनी मात्र याबाबत थेट फ्लोअर टेस्टची मागणी करणे घटनाबाह्य होते अशा आशयाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया आल्या. पण अखेर या निकालाच्या सुमारे, तीन तासानंतर खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनी या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले तत्कालीन राज्यपाल कोश्यारी?

"मी कधीच पदमुक्त झालो आहे. मी राज्यपालपद सोडून आता तीन महिने झाले आहेत. मी राजकीय बाबींपासून नेहमीच अंतर ठेवून असतो. जो विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होता, त्यावर त्यांनी निर्णय दिला आहे. अशा बाबींवर कायद्याचे जाणकारच आपले मत व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा अभ्यासक नाही, मी केवळ संसदीय कार्यशैली जाणतो, त्यामुळे मी यावर बोलणे उचित ठरणार नाही. मी त्यावेळी जे निर्णय घेतले ते पूर्णपणे विचार करून घेतले होते. जर एखादा व्यक्ती माझ्याकडे राजीनामा घेऊन आला, तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असं म्हणणार का..?? सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे त्यावर विवेचन करणे हे तुम्हा लोकांचे काम आहे. मी त्यावर टिपण्णी देणार नाही," असे ते म्हणाले.

शिंदे-फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली. त्यांची पत्रकार परिषद मी सहसा पाहत नाही. मात्र आज पाहिली. त्यात त्यांनी आपण नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होते, तेव्हा त्यांनी नैतिकता कुठे होती कुठल्या डब्यात बंद केली होती. जनादेश डावलून मविआ स्थापन केली तेव्हा नैतिकता कुठे होती." तर एकनाथ शिंदे म्हणाले, "माजी मुख्यमंत्र्यांनी तेव्हा राजीनामा दिला. नैतिकतेचे कारण देऊन सांगताहेत. त्यांना माहिती होते, त्यांच्याकडे बहुमत नाहीय. अल्पमतात आलेले सरकार आहे. राज्यपालांच्या विषयावर बोलू इच्छित नाही. राज्यपालांनाच काय तुम्हाला सर्वांनाच माहिती होते, ते अल्पमतात आलेय. यामुळे राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेतला. हेडकाऊंट झाला त्याचे तुम्हा साक्षीदार आहात. नैतिकतेच्या ज्या गोष्टी सुरु झाल्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीला जनतेने बहुमत दिले होते. लोकांना हवे होते ते केले. भाजपासोबत निवडणूक लढविली आणि सत्तेच्या खूर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले, यामुळे नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले, बाळासाहेबांचा पक्ष वाचविला, तुम्ही गहाण ठेवला होता."

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे