शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:20 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या  बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र बहुमत चाचणीला सामोरे जावे असा सल्ला दिला आहे.

मुंबई - गेल्या काही तासांत घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे संकटात सापडले आहे. काल रात्री भाजपा नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार अल्पमता असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या  बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र बहुमत चाचणीला सामोरे जावे असा सल्ला दिला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पुढे कुठले पाऊल उचलावे यावरून महाविकास आघाडीमध्ये तसेच शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा द्यावा, असा  शिवसेनेमध्ये एक मतप्रवाह आहे. जर उद्या अधिवेशन झाले तर भाजप आणि बंडखोर गटाकडून महाविकास आघाडी सरकारवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनातीला कामकाजाचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे, त्यामुळे शिवसेनेची बदनामी होईल, असे या गटाचे म्हणणे आहे.

मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जाईल.  त्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होतील. त्यानंतर त्या मुद्द्याचं निमित्त करून हिंदुत्वाचा दाखला देत उद्धव ठाकरे राजीनामा देतील. तसेच शेवटच्या क्षणी हिंदुत्वाचं कार्ड खेळून हिंदुत्ववादी मतदारांना शिवसेनेकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील, असेही सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना