शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Maharashtra Political Crisis: आम्हाला गद्दार म्हणू नका, उद्या विरोधात मतदान केले तर...; केसरकर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:46 PM

Eknath Shinde Revolt: सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू असं आव्हान केसरकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलंय.

गुवाहाटी -  उद्या आम्हाला मतदान करायला लागलं तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केले हे बोलू नका. आम्हाला गद्दार एकाही शिवसैनिकांनी म्हणू नये. कितीवेळा आम्ही आवाहन करणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे. युवासेनेची ताकद लोकांच्या मागे वाहन लावण्यासाठी करू नये. राजकारणात सत्ता येते आणि जाते. समविचारी पक्षासोबत राहा. उद्या आवाहन करायला मी नसेन. शिंदे गट जो निर्णय घेईल त्याच्यासोबत जावं लागेल असा इशारा शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू. महाराष्ट्रात लोकशाही आहे. त्याला थोर परंपरा आहे. रस्त्यावर येण्याची भाषा राऊत करतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणू शकतो. जेलमध्ये पाठवू शकतो. आधी राजीनामा द्या मग बोला. राऊत जी भाषा बोलतायेत त्यामुळे ५० आमदार संतप्त झालेत अशी माहिती केसरकरांनी दिली. 

आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीप्रेतांची मते घेऊन निवडून आलात तर राजीनामा द्या, संजय राऊतांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. गद्दार हा आमचा शब्द आमच्या वाणीवर येणार नाही. राऊतांनी काय काय केले हे लेखी दिले आहे. राऊतांमुळेच शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये. बाळासाहेबांना अपेक्षित विजय कोकणात मिळाला. आपल्याच माणसांना जबरदस्तीने बाहेर पाठवतायेत आणि त्यांना गद्दारीचा शिक्का मारताय. एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेसाठी झटकले. मुख्यमंत्रिपद विचारलं तरी घेतलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला ते कंटाळले. मला जे काही वाटले ते उघडपणे बोललो. ५० आमदारांच्या भावना आम्ही व्यक्त केला. माझ्या मतदारसंघात मी २ हजार रस्त्यावर उतरवलो शकतो. १५० जणांचे आंदोलन करता असंही त्यांनी सांगितले आहे. 

BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी बोलावंआमचा संयम सुटत चालला आहे. दिल्लीतील भाजपा नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी बोलावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजपा-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख मोदीजी तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला असं आवाहन केसरकरांनी केले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे