शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महाविकास आघाडी सरकार कायम राहणार, की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार? असे आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 06:19 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार आणि कधी, या विषयी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. 

मुंबई :  राज्याचे सत्ताकारण आता कसेकसे वळण घेत जावू शकते या बाबत प्रचंड उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार आणि कधी, या विषयी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. 

भाजपचे नेते सांगतात... -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आमच्यासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत, असे भाजपचे नेते सांगत आहेत.

शिवसेना नेते करतात दावा...जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने आणि अजय चौधरींच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली मान्यता कायम असल्याने आता शिंदे गटाची मोठी अडचण झाली असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

विश्वास मताला सामाेरे जाणेसरकार अल्पमतात आल्याचा दावा विरोधकांकडून राज्यपालांकडे केला जाईल. त्यावर राज्यपाल सरकारला विश्वासमत सिद्ध करायला सांगतील. विश्वासमताच्या वेळी शिंदे गट अनुपस्थित राहील. त्या परिस्थितीत बहुमतासाठी १२५ एवढे संख्याबळ लागेल. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे १२६ तर महाविकास आघाडीकडे १२१ (शिंदे गट वगळून) आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना न्यायालयाने अनुमती नाकारली तर महाविकास आघाडीकडे ११९ आमदार असतील....तर मविआ सरकार गडगडेलविश्वासमताच्या वेळी शिंदे गट सरकारविरोधात मतदान करेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार गडगडेल. भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल व भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल. भाजपकडून लगेच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल आणि शिंदे गटाला मान्यता दिली जाईल. मात्र, प्रकरण पुढे न्यायालयात जाईल व सरकारवर टांगती तलवार असेल. मात्र अशी प्रकरणे न्यायालयात अनेक दिवस चालतात, त्यामुळे कदाचित पुढची अडीच वर्षेही भाजप सरकार चालवेल.

विलीनीकरणाचाही पर्याय विश्वासमताच्या आधी एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये वा अन्य एखाद्या पक्षात विलिन होईल आणि सरकार अल्पमतात येईल. भाजप सत्तास्थापनेचा दावा करेल व सरकार बनवेल.मात्र, विलिनीकरणामुळे शिंदे गट त्यांना सध्या असलेली सहानुभूती गमावण्याचा धोका आहे.

...तर राज्यात राष्ट्रपती राजवटराज्यात सध्या कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताबाहेर गेल्याचे नमूद करत राज्यपाल हे केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतील. त्यावर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करू शकेल.त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावणे वा मध्यावधी निवडणूक हे दोन पर्याय असतील. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे