शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महाविकास आघाडी सरकार कायम राहणार, की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार? असे आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 06:19 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार आणि कधी, या विषयी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. 

मुंबई :  राज्याचे सत्ताकारण आता कसेकसे वळण घेत जावू शकते या बाबत प्रचंड उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार आणि कधी, या विषयी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. 

भाजपचे नेते सांगतात... -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आमच्यासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत, असे भाजपचे नेते सांगत आहेत.

शिवसेना नेते करतात दावा...जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने आणि अजय चौधरींच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली मान्यता कायम असल्याने आता शिंदे गटाची मोठी अडचण झाली असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

विश्वास मताला सामाेरे जाणेसरकार अल्पमतात आल्याचा दावा विरोधकांकडून राज्यपालांकडे केला जाईल. त्यावर राज्यपाल सरकारला विश्वासमत सिद्ध करायला सांगतील. विश्वासमताच्या वेळी शिंदे गट अनुपस्थित राहील. त्या परिस्थितीत बहुमतासाठी १२५ एवढे संख्याबळ लागेल. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे १२६ तर महाविकास आघाडीकडे १२१ (शिंदे गट वगळून) आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना न्यायालयाने अनुमती नाकारली तर महाविकास आघाडीकडे ११९ आमदार असतील....तर मविआ सरकार गडगडेलविश्वासमताच्या वेळी शिंदे गट सरकारविरोधात मतदान करेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार गडगडेल. भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल व भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल. भाजपकडून लगेच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल आणि शिंदे गटाला मान्यता दिली जाईल. मात्र, प्रकरण पुढे न्यायालयात जाईल व सरकारवर टांगती तलवार असेल. मात्र अशी प्रकरणे न्यायालयात अनेक दिवस चालतात, त्यामुळे कदाचित पुढची अडीच वर्षेही भाजप सरकार चालवेल.

विलीनीकरणाचाही पर्याय विश्वासमताच्या आधी एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये वा अन्य एखाद्या पक्षात विलिन होईल आणि सरकार अल्पमतात येईल. भाजप सत्तास्थापनेचा दावा करेल व सरकार बनवेल.मात्र, विलिनीकरणामुळे शिंदे गट त्यांना सध्या असलेली सहानुभूती गमावण्याचा धोका आहे.

...तर राज्यात राष्ट्रपती राजवटराज्यात सध्या कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताबाहेर गेल्याचे नमूद करत राज्यपाल हे केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतील. त्यावर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करू शकेल.त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावणे वा मध्यावधी निवडणूक हे दोन पर्याय असतील. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे