शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण प्रस्तावाचा वाद; शिवसेनेचा एक्झिट प्लॅन ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:30 IST

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आ

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अन्य ११ आमदारांनी मविआचं समर्थन काढलं आहे. त्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देत ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यपालांच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे आहेत. यातच शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणत सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन बनवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं असा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत आणला जाणार आहे. औरंगाबादसोबत उस्मानाबादचं धाराशीव नामांतरण करावं असाही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणला जाईल.

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आता सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सामोरे जायचं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतरणाचा प्रस्ताव आणून शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एक्झिट प्लॅन ठरवला आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ