शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण प्रस्तावाचा वाद; शिवसेनेचा एक्झिट प्लॅन ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:30 IST

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आ

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अन्य ११ आमदारांनी मविआचं समर्थन काढलं आहे. त्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देत ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यपालांच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे आहेत. यातच शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणत सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन बनवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं असा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत आणला जाणार आहे. औरंगाबादसोबत उस्मानाबादचं धाराशीव नामांतरण करावं असाही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणला जाईल.

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आता सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सामोरे जायचं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतरणाचा प्रस्ताव आणून शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एक्झिट प्लॅन ठरवला आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ