शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण प्रस्तावाचा वाद; शिवसेनेचा एक्झिट प्लॅन ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:30 IST

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आ

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अन्य ११ आमदारांनी मविआचं समर्थन काढलं आहे. त्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देत ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यपालांच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे आहेत. यातच शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणत सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन बनवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं असा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत आणला जाणार आहे. औरंगाबादसोबत उस्मानाबादचं धाराशीव नामांतरण करावं असाही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणला जाईल.

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आता सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सामोरे जायचं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतरणाचा प्रस्ताव आणून शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एक्झिट प्लॅन ठरवला आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ