शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला आधीच दिला होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:23 IST

त्याचसोबत काँग्रेस मंत्र्याने दुसरी सूचना दिली होती ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल.

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांचे बंड चपळाईने हाताळले असते तर महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे वाचवू शकले असते असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देण्यापर्यंत. बंडखोरी शमवण्यासाठी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची बातमी आहे. 

बंडखोरीची चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी असा सल्ला दिला होता. मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक मंत्री आणि आमदारांची संख्या शिंदे गटात सहभागी होण्यासाठी वाढत राहिली अशी माहिती इकोनॉमिक्स टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 

त्याचसोबत काँग्रेस मंत्र्याने दुसरी सूचना दिली होती ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी या शिवसेनेच्या याचिकेवर जेव्हा कोर्टाने नकारात्मक निकाल दिला तेव्हा रात्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. या संवादात उद्धव ठाकरे स्वत: महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी, शिवसेनेतील बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार झाली होती. मंत्री अशोक चव्हाणांनी मला ते सांगितले असं विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. काँग्रेसनं दिलेल्या २ सूचनांपैकी ती एक सूचना होती. 

....अन् उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाविधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले. सुरुवातीला हा आकडा १५-२० आमदारांपर्यंत मर्यादित होता. त्यानंतर तातडीने उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले. या बैठकीला उपस्थित झालेले आमदार, मंत्रीही टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणी वाढत गेल्या. त्यात विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्तांतर घडवलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली. आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची यावरूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई तीव्र होणार असल्याचं समोर येत आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे