शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

'फ्लोअर टेस्ट'ला एमआयएमचे आमदार कोणाच्या बाजूने? ओवेसी काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:15 IST

एकनाथ शिंदे गट बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार

Maharashtra Political Crisis AIMIM Owaisi: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी फ्लोअर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने नाही असे सध्या तरी दिसत आहे. महाविकास आघाडी 'नंबर गेम'मध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कशी झाली? निवडणुकीच्या प्रचारावेळी तर तुम्ही म्हणत होतात की ओवेसीला मत देऊ नका, शिवसेना भाजपाला रोखण्यासाठी आम्हाला मतदान करा. मग निवडणुकीनंतर अचानक तुमची मनं कशी काय जुळली?", अशा रोखठोक शब्दांत ओवेसींनी महाविकास आघाडीला सवाल केले. याच वेळी फ्लोअर टेस्ट साठी एमआयएमचे आमदार उपस्थित राहणार का यावरही त्यांनी भाष्य केले.

AIMIM चे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. हे दोन्ही आमदार फ्लोअर टेस्टला उपस्थित राहतील की नाही याबाबत सध्या एआयएम प्रमुखांनी निर्णय घेतलेला नाही. त्याच वेळी, राज्यपालांनी ३० जुलै रोजी फ्लोअर टेस्टची घोषणा केली आहे. फ्लोअर टेस्ट सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी ५ वाजेपूर्वी पूर्ण करावी लागेल. मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात फ्लोअर टेस्टची मागणी करत राजभवनात गाठले. त्यानंतर शिवसेनेचे बहुतांश आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले असून त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहायचे नाही, असे फडणवीस म्हणाले होते. उद्धव सरकार अल्पमतात आहे. या स्थितीत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.

AIMIM मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकही लढवणार असल्याचे ओवेसींनी सांगितले. आम्ही हिंदूंच्या विचारधारेच्या विरोधात नाही तर सावरकरांनी लिहिलेल्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याचा धर्म कोणता होता? ज्याने राजीव गांधींची हत्या केली त्याचा धर्म काय होता? दिल्लीतील शीखांच्या हत्याकांडाला कोणता धर्म जबाबदार होता? छत्तीसगडमध्ये ज्यांनी आमचे जवान मारले त्यांचा धर्म काय होता? त्यामुळे भाजपने धर्मावर का बोलू नये? अशा शब्दांत त्यांनी भाजरावरही टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनEknath Shindeएकनाथ शिंदे