शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वैद्यकीय कचरा गोळा करण्यात महाराष्ट्र एक नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 04:05 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या छोट्या दवाखान्यांपासून ते मोठमोठ्या रुग्णालयांतून दररोज ७१ हजार ५११ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

- कुलदीप घायवटमुंबई - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या छोट्या दवाखान्यांपासून ते मोठमोठ्या रुग्णालयांतून दररोज ७१ हजार ५११ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. राज्यापाठोपाठ कर्नाटकातून ६६ हजार ४६८ किलोग्रॅम, तामिळनाडू ४० हजार ५५२ किलोग्रॅ२२२२२म आणि केरळ ३७ हजार ७७३ किलोग्रॅम कचरा दरदिवशी जमा करण्यात येत असून, देशात एकूण ५ लाख १९ हजार किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत आहे, असे केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या अहवालानुसार, बेड असलेल्या एकूण रुग्णालयांची संख्या २० हजार २२५ असून संपूर्ण राज्यात एकूण बेडची संख्या २ लाख ५१ हजार ९४८ आहे. नॉन बेड रुग्णालयांची संख्या ३२ हजार ४७९ असून यामध्ये रक्तपेढी, अ‍ॅक्युपंक्चर यांचा समावेश आहे. बेड असलेल्या रुग्णालयामधून दररोज ५७ हजार ७७२ किलोग्रॅम कचरा गोळा केला जातो. नॉन बेड रुग्णालयामधून दररोज १३ हजार ६६७ किलोग्रॅम कचरा गोळा केला जातो.नागरी वस्तीमधून व इतर ठिकाणांहून ७० किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात येतो. राज्यामध्ये मुंबईमधून दरदिवशी १७ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत आहे. राज्यात मुंबई अव्वल क्रमांकावर आहे. मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यात दरदिवशी ११ हजार किलोग्रॅम, नाशिकमध्ये ८ हजार किलोग्रॅम, औरंगाबाद ५ हजार ५५२ किलोग्रॅम, नागपूरमधून ५ हजार ५४८ किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा केला जातो.वैद्यकीय कचरा म्हणजे काय?वैद्यकीय कचरा म्हणजे संसर्गजन्य साहित्य किंवा संसर्गजन्य पदार्थ असलेला कोणताही कचरा. यामध्ये आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणारे चिकित्सक कार्यालय, रुग्णालये, दंत रुग्णालये, प्रगोगशाळा, वैद्यकीय संशोधन सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाने यामधून तयार होणाऱ्या कचºयाला वैद्यकीय कचरा म्हणतात. वैद्यकीय कचºयात सुई, इंजेक्शन, सलाइन बाटल्या, आॅपरेशन केलेले ग्लोव्हज्, औषधांच्या बाटल्या, प्रयोगशाळेतील बाटल्या, रसायन, रेझर, धागे यांचा समावेश आहे.रुग्णालयातील कचºयाचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. धोकादायक वैद्यकीय कचरा जाळण्यात येतो. प्लॅस्टिक कचºयाचा भुगा करून पुनर्वापर करण्यात येतो. सुई, इंजेक्शन इत्यादी वस्तू १ हजार २०० अंश सेल्सिअस तापमानावर तापवून निर्जंतुकीकरण करण्यात येते.कचºयावर पुनर्प्रक्रिया, निर्जंतुकीकरण केले जात असून, संबंधित वस्तूचा पुनर्वापर करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेला वैद्यकीय कचरा जाळण्यात येत आहे.राज्यातील वैद्यकीय कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे राज्यातील कचºयाचे योग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीेचे आहे. यंदाच्या वर्षात बारकोडिंगची पद्धत करण्यात आली आहे. बारकोडनुसार वैद्यकीय कचºयाचा वापर आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात येईल.- डॉ. ए.आर. सुपाते, प्रधान वैज्ञानिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळरुग्णालयातील कर्मचारीवर्ग, सफाई कामगारवर्ग यांना कचºयाच्या वर्गीकरणाचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे पालन करून कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण केल्यावर कचरा कमी होऊ शकतो.- चेतन सावंत, कनिष्ठ साहाय्यक वैज्ञानिक,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र