शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अखंड राहायलाच हवा!

By admin | Updated: August 2, 2016 06:05 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. ‘स्वतंत्र विदर्भ राज्य नको. महाराष्ट अखंडच राहायला हवा’, असा ठराव मांडण्याची जोरदार मागणी करीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहातील कामकाज रोखून धरले. तर राज्य निर्मिती हा केंद्र शासनाच्या अख्यत्यारीतील विषय असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांनी ‘अखंड महाराष्ट्र’ अशी अक्षरे असलेल्या टोप्या घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा सुरू केल्या. सभागृहात अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यापूर्वीच शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा देत विदर्भ राज्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत केलेल्या वक्तव्याचेही पडसाद सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी सरकारने या विषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे संतप्त सदस्य वेलमध्ये उतरले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही सदस्य ‘अखंड महाराष्ट्र माझा’ असे लिहिलेले शर्ट घालून आले होते. महाराष्ट्र अखंड राहिलाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. गदारोळामध्ये अध्यक्षांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. अखेर अडीच तासांचे कामकाज पुढे ढकलत बाकीचे कामकाज गुंडाळण्यात आले आणि सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. संयुक्त महाराष्ट्राचा ठराव विधानसभेत झालाच पाहिजे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून तो उभा राहिला आहे. त्याला कोणी धक्काही लावला तरी ते सहन केले जाणार नाही. - प्रताप सरनाईक, शिवसेना नेते (विशेष प्रतिनिधी)>राजदंड पळविण्याचा प्रयत्नशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत तेथील राजदंड उचलला. चोबदाराने त्यांना रोखले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षीरसागर यांना तसे न करण्यास बजावले. तेव्हा कुठे क्षीरसागर यांनी राजदंड सोडला. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी पीठासन अध्यक्ष योगेश सागर यांच्या दिशेने कागदी बोळे फेकले. अनुशेष दूर करूकेंद्र सरकारने नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने आपल्या अहवालात विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याबाबत शिफारस केली होती. मात्र, मराठी भाषकांचे एक राज्य व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन १९५३ मध्ये नागपूर करार केला व त्या अंतर्गत नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे स्थापन करणे, या सर्व प्रदेशाचा एकत्रितपणे सर्वांगीण विकास करणे आणि आवश्यक तेथे अनुशेष दूर करणे या बाबी मान्य केल्या. त्यानुसारविदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.>तुमची भूमिका काय ते सांगा - मुख्यमंत्रीविदर्भ राज्याची भाजपाची भूमिका आहे आणि शिवसेनेची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका स्पष्टच आहे. आम्ही ती मान्यही केली आहे. पण तुमचे काय? काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र हवाय का? तुमच्याच पक्षाचे माणिकराव ठाकरे बाहेर विदर्भ राज्याची भूमिका मांडतात. संयुक्त महाराष्ट्रावर बोलणारे वळसे पाटील यांचे नेते शरद पवार हे वैदर्भीयांची इच्छा असेल तर आमचा विदर्भ राज्याला पाठिंबा राहील, असे सांगतात. विरोधकांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्वत:च तपासून मग बोलावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले.-संयुक्त महाराष्ट्रासाठी स्वत:ला झोकून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत आहेत ही दु:खाची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते होऊ देणार नाही. सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर सरकारने विदर्भ राज्य नको, संयुक्त महाराष्ट्रच हवा, असा ठराव मांडला पाहिजे. - राधाकृष्ण विखे पाटीलविधानसभेचे विरोधी पक्षनेते.