शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

महाराष्ट्र अखंड राहायलाच हवा!

By admin | Updated: August 2, 2016 06:05 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. ‘स्वतंत्र विदर्भ राज्य नको. महाराष्ट अखंडच राहायला हवा’, असा ठराव मांडण्याची जोरदार मागणी करीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहातील कामकाज रोखून धरले. तर राज्य निर्मिती हा केंद्र शासनाच्या अख्यत्यारीतील विषय असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांनी ‘अखंड महाराष्ट्र’ अशी अक्षरे असलेल्या टोप्या घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा सुरू केल्या. सभागृहात अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यापूर्वीच शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा देत विदर्भ राज्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत केलेल्या वक्तव्याचेही पडसाद सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी सरकारने या विषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे संतप्त सदस्य वेलमध्ये उतरले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही सदस्य ‘अखंड महाराष्ट्र माझा’ असे लिहिलेले शर्ट घालून आले होते. महाराष्ट्र अखंड राहिलाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. गदारोळामध्ये अध्यक्षांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. अखेर अडीच तासांचे कामकाज पुढे ढकलत बाकीचे कामकाज गुंडाळण्यात आले आणि सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. संयुक्त महाराष्ट्राचा ठराव विधानसभेत झालाच पाहिजे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून तो उभा राहिला आहे. त्याला कोणी धक्काही लावला तरी ते सहन केले जाणार नाही. - प्रताप सरनाईक, शिवसेना नेते (विशेष प्रतिनिधी)>राजदंड पळविण्याचा प्रयत्नशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत तेथील राजदंड उचलला. चोबदाराने त्यांना रोखले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षीरसागर यांना तसे न करण्यास बजावले. तेव्हा कुठे क्षीरसागर यांनी राजदंड सोडला. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी पीठासन अध्यक्ष योगेश सागर यांच्या दिशेने कागदी बोळे फेकले. अनुशेष दूर करूकेंद्र सरकारने नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने आपल्या अहवालात विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याबाबत शिफारस केली होती. मात्र, मराठी भाषकांचे एक राज्य व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन १९५३ मध्ये नागपूर करार केला व त्या अंतर्गत नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे स्थापन करणे, या सर्व प्रदेशाचा एकत्रितपणे सर्वांगीण विकास करणे आणि आवश्यक तेथे अनुशेष दूर करणे या बाबी मान्य केल्या. त्यानुसारविदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.>तुमची भूमिका काय ते सांगा - मुख्यमंत्रीविदर्भ राज्याची भाजपाची भूमिका आहे आणि शिवसेनेची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका स्पष्टच आहे. आम्ही ती मान्यही केली आहे. पण तुमचे काय? काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र हवाय का? तुमच्याच पक्षाचे माणिकराव ठाकरे बाहेर विदर्भ राज्याची भूमिका मांडतात. संयुक्त महाराष्ट्रावर बोलणारे वळसे पाटील यांचे नेते शरद पवार हे वैदर्भीयांची इच्छा असेल तर आमचा विदर्भ राज्याला पाठिंबा राहील, असे सांगतात. विरोधकांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्वत:च तपासून मग बोलावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले.-संयुक्त महाराष्ट्रासाठी स्वत:ला झोकून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत आहेत ही दु:खाची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते होऊ देणार नाही. सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर सरकारने विदर्भ राज्य नको, संयुक्त महाराष्ट्रच हवा, असा ठराव मांडला पाहिजे. - राधाकृष्ण विखे पाटीलविधानसभेचे विरोधी पक्षनेते.