शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"आईला ते कधीच आवडायचं नाही"; पाहा कसा झाला आव्हाडांचा राजकारणात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:38 IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या मनात राजकारणाची आवड केव्हापासून निर्माण झाली आणि कसा त्यांनी राजकारणात प्रवेश केला याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला. UPSC ची संधी हुकल्याबद्दलही केलं वक्तव्य.

जितेंद्र आव्हाड हा चेहरा आज महाराष्ट्रातीलराजकारणात सर्वांच्याच परिचयाचा आहे. परंतु त्याच्या मनात राजकाणाबाबतची आवड कशी निर्माण झाली आणि त्यांचा हा प्रवास केव्हापासून सुरू झाला, याचा उलगडा खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी सांधलेल्या संवादादरम्यान केला. लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आव्हाड यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपल्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाचा उलगडला आहे. आपण कॉलेजपासूनच राजकारणाकडे वळत गेलो आणि त्या गोष्टी आपोआप होत गेल्या असं आव्हाड यावेळी म्हणाले. 

"कॉलेजमध्ये असताना माझी ओळख निर्माण होत गेली. त्यावेळी कॉलेजमध्ये ऑल इंडिया स्टुंडेंट ऑर्गनायझेशन अशी एक संस्था होती. शिवसेना सोडून दिलीप हाटे बाहेर पडले होते. त्यांनी ही विद्यार्थी संघटना काढली. काही मत्र्यांच्या ओळखीनं मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यावेळी काँग्रेसची एनएसयू, शिवसेनेची बीवीएस आणि दिलीप हाटे यांची आयसो अशा संस्था होता. त्यावेळई आयसोनं विजय मिळवला होता. त्यावेळपासून राजकरणाची आवड निर्माण झाली," असं आव्हाड म्हणाले. "यासाठी मी घरी बोलणीही ऐकायचो. माझ्या आईला ते कधीच आवडायचं नाही," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

UPSC ची संधी हुकली"१९८४ मध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि त्याच वर्षी मी युपीएससी दिली. परंतु त्यावेळी मी ३ मार्क्सनं नापास झालो. त्यानंत लगेच पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली. त्यावेळी एका मार्कानं नापास झालो. आईची इच्छा मी चांगलं शिकून सरकारी नोकरी वगैरे करण्याची होती. त्यावेळी मरीन इंजिनिअरींगही करत होतो. माझ्या आयुष्यात ठरवून काहीच झालं नाही" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.शरद पवारांबद्दलही सांगितला किस्सा"सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेलं. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्ष मी हे केलं. आधी त्यांचं लक्ष नसायचं. पण जसं जसं त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरूवात केली," असं आव्हाड म्हणाले.

"एकदा त्यांनी मला घरी जाण्यासाठी गाडी आहे का असंही विचारलं. त्यानंतर तो किस्सा मी घरी आईला जाऊन सांगितला. तो एक वेगळा काळ आणि माझं पॅशन होतं. एकदा त्यांना मी पुण्याला भेटलो. ते विमानानं मुंबईला येऊन रात्री इस्रायलला जाणार होते. नशीबानं दुसऱ्या विमानातून सुरेश कलमाडी आले. त्यांच्या पीएनं मला विमानानं मुंबईला जा असं म्हटलं. त्यानंतर घरी आलो लगेच तयार होऊन पुन्हा शरद पवारांना सोडायला विमानतळावर गेलो. त्यावेळी त्यांनीही मला विचारलं एवढ्यात कसा आलास अशी विचारणा केली," असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणupscकेंद्रीय लोकसेवा आयोग