शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

लगीन घाईत 'नवरी'चाच विसर! नवरीला एक्स्प्रेसमध्ये विसरुन व-हाडी मंडपात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 13:42 IST

लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली.

- मनीषा म्हात्रे  मुंबई - लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली. एक्सप्रेसने नागपुरहून नाशिककडे वऱ्हाड नवऱ्या मुलीला घेऊन निघाले. पण, नाशिक येताच इतकी घाई झाली की नवरी मुलगी ट्रेनमध्येच राहिली आणि वऱ्हाडने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीचा शोध सुरु झाला. नाशिक स्थानक आले तेव्हा नवरी टॉयलेटमध्ये गेली होती, पण हे वऱ्हाडाच्या लक्षात न आल्याने ते नाशिकला उतरून आणि नवरी थेट इगतपुरीला पोहचली. डब्यात मुलीला रडताना पाहून इगतपुरी पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सूखरूप तिला लग्नमंडपात पोहचविले.         नागपुरच्या गोपाळ पेठ मध्ये मिरगे कुटुंबिय राहतात. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.रविवारी दुपारी १ वाजता नाशिक रोडयेथे मुलगी रजनीचा विवाह सोहळा होता. सकाळच्या एक्सप्रेसने व-हाड़ नवरीला घेउन नागपुरहून नाशिककड़े यायला निघाले. त्याच दरम्यान सकाळी साडे आठच्या सुमारास एक्सप्रेस नाशिक रोडवर आली. त्यापूर्वीच  नवरी बाथरूममध्ये गेली. इथे स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात ते नवरीला बाथरूममध्येच सोडुन निघाले. व-हाडाने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीच ग़ायब असल्याने सर्वाच्याच भुवया उँचावल्या. मंडपात नवरीचा शोध सुरु झाला. फोनाफोनी सुरु झाली.         हा शोध सुरु असताना इथे बाथरूममधुन बाहेर आलेल्या नवरीच भलतीच तारांबळ उडाली. व-हाडी न दिसल्याने ती घाबरली. अनोळख़ी चेहरे पाहुन तिही रड़ु लागली. अशातच इगतपूरी स्थानक येताच रेल्वे पोलिसांकडून सामानाची झड़ती सुरु झाली. त्याच दरम्यान पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळूंखे यांचे लक्ष रजनीकड़े गेले. त्यांनी तिच्याकड़े विचारपूस केली. मात्र घाबरलेली रजनी हंबरडा फोडून फ़क़्त नाशिकला उतरायचे होते असे सांगत होती. जाधव तिला घेउन आरपीएफ कक्षात आले. तेथे तिला विश्वासात घेत चौकशी सुरु केली तेव्हा वरील घटनाक्रम उलगडला. त्यांनी तत्क़ाळ तिने दिलेल्या मोबाईल क़्रमाँकावर संपर्क साधून मुलीची माहिती दिली. मुलगी सूखरूप असल्याचे समजताच नातेवाईकाँनी नवरीकड़े धाव घेतली.  पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वी मंडपात पोहचली. आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र