शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:10 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  

- सचिन सावंत(सरचिटणीस, काँग्रेस)लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधन व दु:शासन करत होते तेव्हा द्रोणाचार्य, भीष्माचार्य तथा सभागृहातील सर्वजण स्वस्थ बसले होते. त्यावेळी जनार्दनाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले. गेली दहा वर्षे लोकशाहीचे वस्त्रहरण होत होते आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या सर्व संविधानिक संस्था सरकारच्या भाट झाल्या होत्या किंवा आत्मबळ हरवून बसल्या होत्या. अशावेळी लोकशाहीचे रक्षण हे जनता जनार्दनाने केले आहे. 

ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे होती यात शंका नाही. निवडणुकीमध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सत्ताधारी व विरोधकांना समान संधीचा मागमूसही नव्हता. दोन मुख्यमंत्री व अनेक नेते जेलमध्ये पाठवले गेले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले किंबहुना चोरण्यात आले. निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे. भाजपच्या आर्थिक व सत्तेच्या पाशवी बळाविरोधात लढणे सोपे नव्हते.  ही लढाई खरे तर जनतेनेच हाती घेतली आणि भाजपचा देशभर उधळलेला वारू महाराष्ट्राने रोखला. अहंकार, अनीती आणि अत्याचार जनतेला चालत नाही हे या निकालांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले, याचे समाधान वाटते. 

     उत्तर मुंबईतील जागा आम्ही मोठ्या फरकाने हरलो याचे दुःख जरूर आहे.      यावेळी भाजपने उमेदवार लवकर घोषित केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला.      महाविकास आघाडीतील जागावाटप अजून लवकर झाले असते आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकर घोषित झाला असता तर लढाई अधिक जोमाने लढता आली असती.      विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर व्हावे ही अपेक्षा आहे.      ही लढाई महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लढून भाजपला धोबीपछाड दिली याचा आनंद आहे.  

अभूतपूर्व समन्वयलोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली. यामुळे काही नेते पक्ष सोडूनही गेले. परंतु पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे, हा त्यामागे काँग्रेस पक्षाचा उद्देश होता. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचा एकमेकांशी अभूतपूर्व समन्वय होता हे आवर्जून सांगावे लागेल.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSachin sawantसचिन सावंत