शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:10 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  

- सचिन सावंत(सरचिटणीस, काँग्रेस)लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधन व दु:शासन करत होते तेव्हा द्रोणाचार्य, भीष्माचार्य तथा सभागृहातील सर्वजण स्वस्थ बसले होते. त्यावेळी जनार्दनाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले. गेली दहा वर्षे लोकशाहीचे वस्त्रहरण होत होते आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या सर्व संविधानिक संस्था सरकारच्या भाट झाल्या होत्या किंवा आत्मबळ हरवून बसल्या होत्या. अशावेळी लोकशाहीचे रक्षण हे जनता जनार्दनाने केले आहे. 

ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे होती यात शंका नाही. निवडणुकीमध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सत्ताधारी व विरोधकांना समान संधीचा मागमूसही नव्हता. दोन मुख्यमंत्री व अनेक नेते जेलमध्ये पाठवले गेले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले किंबहुना चोरण्यात आले. निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे. भाजपच्या आर्थिक व सत्तेच्या पाशवी बळाविरोधात लढणे सोपे नव्हते.  ही लढाई खरे तर जनतेनेच हाती घेतली आणि भाजपचा देशभर उधळलेला वारू महाराष्ट्राने रोखला. अहंकार, अनीती आणि अत्याचार जनतेला चालत नाही हे या निकालांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले, याचे समाधान वाटते. 

     उत्तर मुंबईतील जागा आम्ही मोठ्या फरकाने हरलो याचे दुःख जरूर आहे.      यावेळी भाजपने उमेदवार लवकर घोषित केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला.      महाविकास आघाडीतील जागावाटप अजून लवकर झाले असते आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकर घोषित झाला असता तर लढाई अधिक जोमाने लढता आली असती.      विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर व्हावे ही अपेक्षा आहे.      ही लढाई महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लढून भाजपला धोबीपछाड दिली याचा आनंद आहे.  

अभूतपूर्व समन्वयलोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली. यामुळे काही नेते पक्ष सोडूनही गेले. परंतु पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे, हा त्यामागे काँग्रेस पक्षाचा उद्देश होता. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचा एकमेकांशी अभूतपूर्व समन्वय होता हे आवर्जून सांगावे लागेल.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSachin sawantसचिन सावंत