शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:10 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  

- सचिन सावंत(सरचिटणीस, काँग्रेस)लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधन व दु:शासन करत होते तेव्हा द्रोणाचार्य, भीष्माचार्य तथा सभागृहातील सर्वजण स्वस्थ बसले होते. त्यावेळी जनार्दनाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले. गेली दहा वर्षे लोकशाहीचे वस्त्रहरण होत होते आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या सर्व संविधानिक संस्था सरकारच्या भाट झाल्या होत्या किंवा आत्मबळ हरवून बसल्या होत्या. अशावेळी लोकशाहीचे रक्षण हे जनता जनार्दनाने केले आहे. 

ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे होती यात शंका नाही. निवडणुकीमध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सत्ताधारी व विरोधकांना समान संधीचा मागमूसही नव्हता. दोन मुख्यमंत्री व अनेक नेते जेलमध्ये पाठवले गेले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले किंबहुना चोरण्यात आले. निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे. भाजपच्या आर्थिक व सत्तेच्या पाशवी बळाविरोधात लढणे सोपे नव्हते.  ही लढाई खरे तर जनतेनेच हाती घेतली आणि भाजपचा देशभर उधळलेला वारू महाराष्ट्राने रोखला. अहंकार, अनीती आणि अत्याचार जनतेला चालत नाही हे या निकालांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले, याचे समाधान वाटते. 

     उत्तर मुंबईतील जागा आम्ही मोठ्या फरकाने हरलो याचे दुःख जरूर आहे.      यावेळी भाजपने उमेदवार लवकर घोषित केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला.      महाविकास आघाडीतील जागावाटप अजून लवकर झाले असते आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकर घोषित झाला असता तर लढाई अधिक जोमाने लढता आली असती.      विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर व्हावे ही अपेक्षा आहे.      ही लढाई महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लढून भाजपला धोबीपछाड दिली याचा आनंद आहे.  

अभूतपूर्व समन्वयलोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली. यामुळे काही नेते पक्ष सोडूनही गेले. परंतु पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे, हा त्यामागे काँग्रेस पक्षाचा उद्देश होता. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचा एकमेकांशी अभूतपूर्व समन्वय होता हे आवर्जून सांगावे लागेल.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSachin sawantसचिन सावंत