शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मविआ आणि वंचितमध्ये निर्भय बनो मध्यस्थी करणार, जागावाटपावर तोडगा काढणार? लिहिलं खुलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 20:21 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: वंचित आणि मविआमध्ये झालेले मतभेद मिटवण्यासाठी ‘निर्भय बनो’कडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्भय बनोच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला खुलं पत्र लिहिण्यात आलं असून, जागावाटपातील संभ्रमावस्था लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये ऐक्य साधून मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येईल, अशी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपामध्ये मतभेद झाल्याने मविआ आणि वंचित यांच्यातील संभाव्य आघाडी मोडली आहे. मात्र आता वंचित आणि मविआमध्ये झालेले मतभेद मिटवण्यासाठी ‘निर्भय बनो’कडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्भय बनोच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला खुलं पत्र लिहिण्यात आलं असून, जागावाटपातील संभ्रमावस्था लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. 

वंचित आणि महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवण्यासाठी निर्भय बनोच्यावतीने असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी वंचितला खुलं पत्र लिहिलं आहे. वंचित बहुजन आघाडी यांनी त्यांना कुठले मतदारसंघ हवे आहेत, ते पत्राच्या माध्यमातून कळवावे. वंचितने असं पत्र दिल्यास त्याआधारावर आम्ही इतर पक्षांशी संपर्क साधू, असे निर्भय बनोच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

जागावाटपामधील संभ्रमावस्था ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे. यावेळची लोकसभा निवडणूक संविधानाच्या रक्षणासाठी महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा पराभव करण्यासाठी आता केवळ संविधान रक्षण महत्त्वाचे मानले पाहिजे. वंचितने लोकशाही मानणाऱ्या इतर सर्व पक्षांसोबत राहावे, असे आवाहन या पत्रामधून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४