शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:35 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: मागच्या काही दिवसांपासून बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या विशाल पाटील यांनी सांगलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि सांगलीमधील नेते विश्वजित कदम यांनी मोठं विधान केलं आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे नाराज झाले. तसेच त्यांना पक्षाच्या स्थानिक संघटनेकडूनही साथ मिळाली. दरम्यान, विशाल पाटील यांनी सांगलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि सांगलीमधील नेते विश्वजित कदम यांनी मोठं विधान केलं आहे.

विश्वजित कदम म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल मला तातडीने बोलावलं होतं. त्यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि इतर सर्वांची पटोले आणि थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशीही माझं बोलणं झालं. या चर्चेत मी सांगलीमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्यांच्यासमोर मांडली. तसेच या संदर्भात लवकरात लवकर एक संयुक्त मार्ग काढावा ज्यामुळे राज्यातील आणि सांगलीतील महाविकास आघाडीसंदर्भात एक ठोस पाऊल उचलता येईल, असे मी त्यांना सांगितले.

विश्वजित कदम पुढे म्हणाले की, विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही. मात्र कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म हा शेवटच्या क्षणापर्यंत जोडता येऊ शकतो. त्यासाठी १९ एप्रिल रोजी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. माझ्या माहितीप्रमाणे विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यातील एक अर्ज काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आणि दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. सांगलीबाबतच्या निर्णयामध्ये आता बदल होईल की नाही हे मी सांगत नाही. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आता पुढील जबाबदारी ही काँग्रेसच्या राज्य आणि दिल्लीतील नेतृत्वाची आहे. सांगलीबाबत आम्हाला राज्य आणि देशातील काँग्रेसच्या नेत्यांनी साथ दिली. मात्र सांगतील काय परिस्थिती निर्माण झाली त्याचे सगळे साक्षीदार आहेत. त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात अबाधित राहिली पाहिजे. महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. यादृष्टीने आता येणाऱ्या काळात काय पावलं टाकली पाहिजेत, हे आता आमच्या महाराष्ट्रातील आणि देशातील ज्येष्ठांनी ठरवलं पाहिजे, असं विश्वजित कदम म्हणाले.

विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा मिळण्याबाबत मिळण्याबाबत विश्वजित कदम म्हणाले की, सध्या राज्यात वंचितचे अनेक प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगामध्ये काय काय घडतं हे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठरेल. मी काय त्याबाबत फार बोलणार नाही. राहता राहिला प्रश्न अपक्ष लढण्याचा तर त्याबाबत आम्ही जिल्ह्यातील परिस्थिती मांडली आहे. आता त्यावर राज्यातील आणि देशातील वरिष्ठ आमच्याशी बोलून मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे, असेही विश्वजित कदम यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sangli-pcसांगलीvishal patilविशाल पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४