शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   

By बाळकृष्ण परब | Updated: May 2, 2024 14:57 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे.

- बाळकृष्ण परबकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. कोकणात होत असलेली ही लढत नारायण राणेंसोबतच शिवसेना शिंदे गटासाठीही प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांसोबत शिंदे गटाचे नेतेही नारायण राणेंच्या प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत. एकेकाळी राणेंशी राजकीय संघर्ष करणारे दीपक केसरकर हेही गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. या संघर्षानंतर नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली, असे केसरकर यांनी सांगितले.  

नारायण राणेंसोबत झालेला संघर्ष आणि आता झालेल्या मनोमीलनावरून दादा आणि भाईंमधील वाद कसा मिटला, असा प्रश्न विचारला असता, दीपक केसरकर यांनी सांगितलं की, आमचाही एकेकाळी वैचारिक संघर्ष झाला होता. पण कुठे संघर्ष संपवायचा आणि लोकांसाठी कसं एकत्र यायचं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. कुणामध्ये भांडणं होऊ नयेत, मारामाऱ्या होऊ नयेत इथपर्यंत तो विषय मर्यादित होता. एकेकाळी हा संवेदनशील मतदारसंघ होता. मागच्या दहा वर्षांत हा मतदारसंघाची संवेदनशील ही ओळख पटली आणि आता शांततेची संस्कृती इथे नांदत आहे, असे केसरकर म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, एखाद्या गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. परंतु नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली. यापूर्वीसुद्धा मागचे वर्ष दीड वर्ष आमचे जवळचे संबंध आहेत. विकासाची गोष्ट असेल तर ते मला सांगतात. मी त्यांना सांगतो. शेवटी राजकारण कुणासाठी असतं तर ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतं. आम्ही भांडत बसायचं आणि कोकणी माणसानं मागे जायचं. हे याच्यापुढे घडणार नाही. आम्ही एकत्र राहू आणि कोकणचा विकास करू, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४