शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   

By बाळकृष्ण परब | Updated: May 2, 2024 14:57 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे.

- बाळकृष्ण परबकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. कोकणात होत असलेली ही लढत नारायण राणेंसोबतच शिवसेना शिंदे गटासाठीही प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांसोबत शिंदे गटाचे नेतेही नारायण राणेंच्या प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत. एकेकाळी राणेंशी राजकीय संघर्ष करणारे दीपक केसरकर हेही गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. या संघर्षानंतर नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली, असे केसरकर यांनी सांगितले.  

नारायण राणेंसोबत झालेला संघर्ष आणि आता झालेल्या मनोमीलनावरून दादा आणि भाईंमधील वाद कसा मिटला, असा प्रश्न विचारला असता, दीपक केसरकर यांनी सांगितलं की, आमचाही एकेकाळी वैचारिक संघर्ष झाला होता. पण कुठे संघर्ष संपवायचा आणि लोकांसाठी कसं एकत्र यायचं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. कुणामध्ये भांडणं होऊ नयेत, मारामाऱ्या होऊ नयेत इथपर्यंत तो विषय मर्यादित होता. एकेकाळी हा संवेदनशील मतदारसंघ होता. मागच्या दहा वर्षांत हा मतदारसंघाची संवेदनशील ही ओळख पटली आणि आता शांततेची संस्कृती इथे नांदत आहे, असे केसरकर म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, एखाद्या गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. परंतु नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली. यापूर्वीसुद्धा मागचे वर्ष दीड वर्ष आमचे जवळचे संबंध आहेत. विकासाची गोष्ट असेल तर ते मला सांगतात. मी त्यांना सांगतो. शेवटी राजकारण कुणासाठी असतं तर ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतं. आम्ही भांडत बसायचं आणि कोकणी माणसानं मागे जायचं. हे याच्यापुढे घडणार नाही. आम्ही एकत्र राहू आणि कोकणचा विकास करू, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४