शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   

By बाळकृष्ण परब | Updated: May 2, 2024 14:57 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे.

- बाळकृष्ण परबकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. कोकणात होत असलेली ही लढत नारायण राणेंसोबतच शिवसेना शिंदे गटासाठीही प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांसोबत शिंदे गटाचे नेतेही नारायण राणेंच्या प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत. एकेकाळी राणेंशी राजकीय संघर्ष करणारे दीपक केसरकर हेही गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये नेमकं मनोमीलन कसं झालं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता हे मनोमीलन कसं झालं, यामागचा उलगडा स्वत: दीपक केसरकर यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना केला आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. या संघर्षानंतर नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली, असे केसरकर यांनी सांगितले.  

नारायण राणेंसोबत झालेला संघर्ष आणि आता झालेल्या मनोमीलनावरून दादा आणि भाईंमधील वाद कसा मिटला, असा प्रश्न विचारला असता, दीपक केसरकर यांनी सांगितलं की, आमचाही एकेकाळी वैचारिक संघर्ष झाला होता. पण कुठे संघर्ष संपवायचा आणि लोकांसाठी कसं एकत्र यायचं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मुळात आमच्यात तो वाद नव्हताच. तो वाद हा काम करण्याच्या पद्धतीबाबत होता. कुणामध्ये भांडणं होऊ नयेत, मारामाऱ्या होऊ नयेत इथपर्यंत तो विषय मर्यादित होता. एकेकाळी हा संवेदनशील मतदारसंघ होता. मागच्या दहा वर्षांत हा मतदारसंघाची संवेदनशील ही ओळख पटली आणि आता शांततेची संस्कृती इथे नांदत आहे, असे केसरकर म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, एखाद्या गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. परंतु नारायण राणे आणि माझी त्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, ज्यावेळी जिल्ह्याच्या हिताचा विषय येईल. तेव्हा आपल्याला दोघांना एकत्र काम करावं लागेल. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा ती वेळ आली. यापूर्वीसुद्धा मागचे वर्ष दीड वर्ष आमचे जवळचे संबंध आहेत. विकासाची गोष्ट असेल तर ते मला सांगतात. मी त्यांना सांगतो. शेवटी राजकारण कुणासाठी असतं तर ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतं. आम्ही भांडत बसायचं आणि कोकणी माणसानं मागे जायचं. हे याच्यापुढे घडणार नाही. आम्ही एकत्र राहू आणि कोकणचा विकास करू, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४