शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 12:27 IST

Maharashtra Lockdown : कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात लॉकडाऊनच्या नियमात काही सवलती देण्यात आल्या आहे.अत्यावश्यक सेवेतील दुकांनाची वेळ 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे. 

याच पार्श्वभूमीवर 'लोकमत'चे संपादकीय संचालक आणि सह व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ट्विटरच्या माध्यमातून लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? असा एक पोल घेतला. तसेच, या पोलला तीन पर्याय दिले. यामध्ये 1) होय, कोरोना लवकर संपेल. 2) नाही, राज्याचे मोठे नुकसान होईल. 3) आम्हाला आता याची सवय झालीय, असे पर्याय देण्यात आले. दरम्यान, या पोलवर 3 हजार 533 जणांनी आपले मत नोंदविले आहे. यामध्ये 'होय, कोरोना लवकर संपेल', या पर्यायाला सर्वाधिक म्हणजेच 42 टक्के मतं मिळाली आहेत. तर 'नाही, राज्याचे मोठे नुकसान होईल', असे 30 टक्के लोकांचे म्हणणे आहे आणि 'आम्हाला आता याची सवय झालीय', यावर 28 टक्के लोकांनी आपले मत नोंदविले आहे.

दरम्यान, 'ब्रेक द चेन' उपक्रमांतर्गत आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यानुसार लॉकडाऊन संदर्भातील अधिकृत आदेश काही जिल्ह्यांनी जारी केले आहेत. मुंबईसह पुण्यात लॉकडाऊनच्या नियमात काही सवलती देण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनाची वेळ 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस