शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:58 IST

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे.

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ आणि ६ जुलै रोजी हे अधिवेशन होणार आहे. 

राज्याच्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज विधानभवनाच्या प्रांगणात बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत इत्यादी नेते उपस्थित होते.

कोरोनाची सद्य स्थिती आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दोनच दिवसांच्या अधिवेशनाचं कामकाज या बैठकीत निश्चित करण्यात आलं. यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विधानभवनात अधिवेशन काळात प्रवेश करणाऱ्या सर्वांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं आवश्यक असणार आहे. यात सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यासोबतच विधानसभवन  परिसरातील प्रवेशाकरीता सर्वांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी विधानभवन येथे ३ आणि ४ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एका आसनावर दोनऐवजी एकच सदस्य अशाप्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या दोन दिवसीय अधिवेशानावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासमोर इतके गंभीर प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार लोकशाही बासनात गुंडाळण्याचं काम करत असल्याची टीका केली आहे. तसंच बारमध्ये गर्दी चालते, पक्षाच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी गर्दी चालते मग अधिवेशन का नको? असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणVidhan Bhavanविधान भवन