शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:58 IST

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे.

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ आणि ६ जुलै रोजी हे अधिवेशन होणार आहे. 

राज्याच्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज विधानभवनाच्या प्रांगणात बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत इत्यादी नेते उपस्थित होते.

कोरोनाची सद्य स्थिती आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दोनच दिवसांच्या अधिवेशनाचं कामकाज या बैठकीत निश्चित करण्यात आलं. यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विधानभवनात अधिवेशन काळात प्रवेश करणाऱ्या सर्वांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं आवश्यक असणार आहे. यात सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यासोबतच विधानसभवन  परिसरातील प्रवेशाकरीता सर्वांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी विधानभवन येथे ३ आणि ४ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एका आसनावर दोनऐवजी एकच सदस्य अशाप्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या दोन दिवसीय अधिवेशानावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासमोर इतके गंभीर प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार लोकशाही बासनात गुंडाळण्याचं काम करत असल्याची टीका केली आहे. तसंच बारमध्ये गर्दी चालते, पक्षाच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी गर्दी चालते मग अधिवेशन का नको? असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणVidhan Bhavanविधान भवन