शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळात प्रचंड गदारोळ; दिवसभराचे कामकाज गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 03:46 IST

कर्जमाफी, महिला अत्याचारावरून विरोधक आक्रमक

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लागोपाठ दुसऱ्या दिवशी संतप्त विरोधी पक्ष सदस्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचारांसंदर्भात प्रचंड गदारोळ घातला. जोरदार घोषणाबाजीत कामकाज गुंडाळण्यात आले.विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बाकीचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या दोन मुद्यांवर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्ष नाना पटोले यांनी ती अमान्य केली. हे विषय गंभीर आहेतच पण बाकीचेही कामकाज आहे आणि शिवाय आजच्या कामकाजात महिलांवरील अत्याचारांसंदर्भात लक्षवेधी सूचनाही आहे, असे पटोले म्हणाले पण संतप्त विरोधी पक्ष सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.भाजपच्या महिला सदस्यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे लिहिलेले कापडी फलक गळ्यात बांधले होते. या सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणा देत होत्या. विरोधी सदस्यांनी बोंबा मारणे सुरू केले. सरकारने कर्जमाफी योजनेत १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. या गतीने कर्जमाफी देणार असतील तर ४६० महिने लागतील. पहिल्या यादीत बुलडाणा जिल्ह्यातील साखळी या दहा हजार लोकवस्तीच्या गावातील १८२१ शेतकºयांपैकी १९३ जणांनाच पहिल्या यादीत कर्जमाफी दिली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी काय करणार, एकरी २५ हजार रुपये अतिवृष्टीग्रस्तांना देण्याच्या घोषणेचे काय झाले अन् महिला अत्याचार रोखण्यासाठी आताच्या आता चर्चा सुरू करा, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आज अतिशय गंभीर आहे.हिंगणघाटची घटना तर राज्याचे समाजमन सुन्न करणारी आहे. असे फडणवीस म्हणाले. विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. काहीसदस्य वेलमध्ये बसले. गदारोळात कामकाज सुरुवातीला दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या गदारोळात ग्राम पंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्यासंबंधीचे विधेयक मात्र सरकारने आवाजी मतदानाने मंजूर करवून घेतले.विधान परिषदेत दुसºया दिवशीही गोंधळयाच मुद्यांवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधान परिषदेतील कामकाज दुसºया दिवशीही गदारोळातच वाहून गेले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळला पण त्यांना बोलण्याची अनुमती दिली. दरेकर यांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला.आक्रमक झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजीला सुरुवात केली. या गोंधळातच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला.पहिला प्रश्न रवींद्र फाटक यांनी उपस्थित केला. त्याला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिल्याने सभापतींनी पहिल्यांदा ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतरही चर्चेच्या मागणीवर ठाम राहत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० मांडले आणि सरकारतर्फे मंजूर करण्यात आले.विधान परिषदेतील प्रश्नोत्तरेकेळकर समितीचा अहवाल बासनातराज्याच्या मागास भागातल्या अनुशेष भरून काढण्याबाबत नेमण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या समितीने आठ आॅक्टोबर २०१३ रोजी शासनाला अहवाल सादर केला होता. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले.जलसिंचन प्रकल्प नियमितचमागच्या सरकारच्या काळात जलसंपदा विभागाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तास मान्यता मिळण्याआधीच नियमबाह्य पद्धतीने सुमारे ६१४६ कोटी रूपयांच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. यांनी शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी हा प्रश्न उपस्थित केला.ग्रामसडक योजनेत गैरव्यवहार?पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणाºया रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विजय तथा भाई गिरकर, प्रवीण दरेकर आदींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मंडळराज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय जारी करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विलास पोतनीस यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले...तर तिसºया अपत्यासाठी बाळंतपणाची रजाशासकीय व निमशासकीय सेवेतल्या महिला कर्मचाºयांना पहिल्या दोन अपत्यांच्या बाळंतपणासाठी सहा महिन्यांची रजा देण्यात येते. दुसºया बाळंतपणात मूल दगावल्यास ती रजा तिसºया बाळंतपणासाठी देण्यात येते असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनायक मेटे यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे