शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:27 IST

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होऊन गेले तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रतील जनतेने कधी नव्हे तेवढा सत्तासंघर्ष पाहिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्याआधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या दोन महिन्यांत नेते सत्तासंघर्षात गुंतलेले असताना राज्यातील 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 

महाराष्ट्राला गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूराचा सामना करावा लागला आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतमाल खराब झाला होता. तर महापुरामुळे पीकच आले नाही. 2015 मध्येही काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांनी 300 चा आकडा पार केला होता. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के पीक खराब झाले. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 120 आत्महत्या आणि विदर्भामध्ये 112 आत्महत्यांची प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये एकूण 2532 आत्महत्या झाल्या आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 होता. यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास 1 कोटी शेतकरी प्रभावित झाले आहेत. यापैकी 44 लाख शेतकरी एकट्या मराठवाड्यातील आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले 6552 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने 30 सप्टेंबर आधीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये भाजपाने 18 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019