शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:27 IST

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होऊन गेले तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रतील जनतेने कधी नव्हे तेवढा सत्तासंघर्ष पाहिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्याआधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या दोन महिन्यांत नेते सत्तासंघर्षात गुंतलेले असताना राज्यातील 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 

महाराष्ट्राला गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूराचा सामना करावा लागला आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतमाल खराब झाला होता. तर महापुरामुळे पीकच आले नाही. 2015 मध्येही काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांनी 300 चा आकडा पार केला होता. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के पीक खराब झाले. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 120 आत्महत्या आणि विदर्भामध्ये 112 आत्महत्यांची प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये एकूण 2532 आत्महत्या झाल्या आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 होता. यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास 1 कोटी शेतकरी प्रभावित झाले आहेत. यापैकी 44 लाख शेतकरी एकट्या मराठवाड्यातील आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले 6552 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने 30 सप्टेंबर आधीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये भाजपाने 18 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019