शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
4
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
5
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
6
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
9
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
10
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
11
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
12
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
13
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
14
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
15
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
16
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
17
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
18
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
19
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:27 IST

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होऊन गेले तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रतील जनतेने कधी नव्हे तेवढा सत्तासंघर्ष पाहिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्याआधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या दोन महिन्यांत नेते सत्तासंघर्षात गुंतलेले असताना राज्यातील 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 

महाराष्ट्राला गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूराचा सामना करावा लागला आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतमाल खराब झाला होता. तर महापुरामुळे पीकच आले नाही. 2015 मध्येही काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांनी 300 चा आकडा पार केला होता. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के पीक खराब झाले. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 120 आत्महत्या आणि विदर्भामध्ये 112 आत्महत्यांची प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये एकूण 2532 आत्महत्या झाल्या आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 होता. यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास 1 कोटी शेतकरी प्रभावित झाले आहेत. यापैकी 44 लाख शेतकरी एकट्या मराठवाड्यातील आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले 6552 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने 30 सप्टेंबर आधीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये भाजपाने 18 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019