शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:23 IST

हिवाळी अधिवेशन : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रचंड परस्पर विसंगती असलेले हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये ‘त्रिशंकू’चा नवा अर्थ कळला. त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो आणि युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. आमच्यासोबत मते मागणारे निघून गेले, चूक त्यांची होती असे सांगत फडणवीस यांनी,कुछ पन्ने क्या फटेजिंदगी की किताब केजमाने ने समझादौर हमारा खतम हो गया।

असा शेर सुनावला. हे सरकार हे राजकीय स्वार्थापोटी बनलेले असून, त्यास जनादेश मिळालेला नाही. राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे. जनतेच्या मनातील सरकार नाही. बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय? शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्त्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला. ते म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे. सरकार टिकेल की नाही, या भीतीने तर विस्तार टळत नाही ना? नागरिकत्व कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सावरकरांची अखंड हिंदुस्तानची भूमिका यांना (काँग्रेस) मान्य आहे का?

पाच वर्षांत दिले ११ हजार कोटी रुपयेडॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे २६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ३,७८९ कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि ११ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी