शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:23 IST

हिवाळी अधिवेशन : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रचंड परस्पर विसंगती असलेले हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये ‘त्रिशंकू’चा नवा अर्थ कळला. त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो आणि युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. आमच्यासोबत मते मागणारे निघून गेले, चूक त्यांची होती असे सांगत फडणवीस यांनी,कुछ पन्ने क्या फटेजिंदगी की किताब केजमाने ने समझादौर हमारा खतम हो गया।

असा शेर सुनावला. हे सरकार हे राजकीय स्वार्थापोटी बनलेले असून, त्यास जनादेश मिळालेला नाही. राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे. जनतेच्या मनातील सरकार नाही. बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय? शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्त्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला. ते म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे. सरकार टिकेल की नाही, या भीतीने तर विस्तार टळत नाही ना? नागरिकत्व कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सावरकरांची अखंड हिंदुस्तानची भूमिका यांना (काँग्रेस) मान्य आहे का?

पाच वर्षांत दिले ११ हजार कोटी रुपयेडॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे २६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ३,७८९ कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि ११ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी