शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

...तर राज्यातील आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेता येईल; अजित पवारांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 20:26 IST

९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशाच्या धर्तीवरच महाराष्ट्रानं देखील ओबीसीचा डेटा गोळा केला आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित अहवाल मान्य केला पाहिजे. सदर अहवाल मान्य झाला तर राज्यातील निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणासह राबवली जाऊ शकते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 

९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत. वास्तवीक ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह घ्यायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा अहवाल बांठिया समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून १२ जुलैला यावर सुनावणी होणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.  

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवास शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. असं आम्हाला वाटतं. उद्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहुयात. मी काही वकिलांना विचारले, १६ लोकांचा निकाल वेगळा लागला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितली आहे. 

दरम्यान,  राज्यात काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार