शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

महाराष्ट्रात या, प्रकल्पासाठी सवलतीत जागा घ्या; रामदेवबाबांना फडणवीस सरकारची 'स्पेशल' ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:09 IST

'भेल'चा राखीव भूखंड पतंजलीला देण्याचा प्रयत्न

मुंबई/लातूर: सोयाबीन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी फडणवीस सरकारनं लातूरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्यापतंजली समूहाला जमीन देऊ केली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा काही भाग पतंजलीला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारनं पतंजली समूहाला मुद्रांक शुल्कमाफीदेखील देऊ केली आहे, असं वृत्त पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लातूरच्या औसामध्ये पतंजलीनं सोयाबीन प्रक्रिया केंद्र सुरू करावं यासाठी फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी २६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांना पत्रदेखील लिहिलं. औसा भागात एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम) प्रकल्प सुरू करण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी पत्रातून दिलं. 'एमएसएमई प्रकल्पासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्कातून १०० टक्के सूट देण्यात येईल. याशिवाय वीजेच्या दरातही ठराविक कालावधीसाठी सवलत दिली जाईल. वीजेच्या एका युनिटमागे एक रुपयांची सूट देण्यात येईल,' असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. औसामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. यातील ४०० एकर जागा पतंजलीला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असताना त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवला. मात्र एक दशक उलटून गेल्यानंतरही या जागेवर प्रकल्प सुरू झालाच नाही. औसा भागात पतंजली नेमकं कोणतं केंद्र सुरू करणार आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या भागात सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प सुरू होईल, अशी शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली. जिल्ह्यात दोन सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प केंद्रं असल्यानं पतंजलीदेखील अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करेल, असा अंदाज अधिकाऱ्यानं व्यक्त केला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBaba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली