शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Maharashtra Government: शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:24 IST

राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात असून त्यांचे सरकार लवकरच सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या २४ एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. मात्र सुमारे तीन आठवड्यांपर्यंत लांबलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात असून त्यांचे सरकार लवकरच सत्तेवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेतली आहे. सेनेच्या विजयी आमदारांना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मातोश्री येथे बोलावले आहे. आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांना ४-५ दिवसांचे कपडे, ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन येण्याचे आदेश ‘मातोश्री’कडून देण्यात आले आहेत. अलीकडेच काँग्रेसच्या ४४ विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सावध पवित्रा म्हणून जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तर गोवा येथे भाजप सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना