शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:24 IST

राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात असून त्यांचे सरकार लवकरच सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या २४ एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. मात्र सुमारे तीन आठवड्यांपर्यंत लांबलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात असून त्यांचे सरकार लवकरच सत्तेवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेतली आहे. सेनेच्या विजयी आमदारांना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मातोश्री येथे बोलावले आहे. आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांना ४-५ दिवसांचे कपडे, ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन येण्याचे आदेश ‘मातोश्री’कडून देण्यात आले आहेत. अलीकडेच काँग्रेसच्या ४४ विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सावध पवित्रा म्हणून जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तर गोवा येथे भाजप सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना