शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government: 'ऑपरेशन लोटस'ची जवाबदारी भाजपच्या अयारामांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:20 IST

भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी ऑपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : इतके दिवस वेट अ‍ॅण्ड  वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने शनिवारी अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापन केल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे बसले आहे. मात्र आता बहुमताचा आकडा सिद्ध करावा लागणार असल्याने भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' मोहीम आखण्यात आली आहे. याची जवाबदारी इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांनाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे बहुमताची जवाबदारी आता भाजपच्या अयारामांवर असल्याचे बोलले जात आहे.

महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याने व सत्तास्थापनेचा दावा करणार असताना, भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. एका रात्रीत भाजपने शपथविधी उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने शपथविधीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकण्यासाठी आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांना ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.

भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत तर 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं भाजपनं 120 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तर इतर पक्षांमधील आमदारांना फोडून सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी सुरुवातीला मांडली होती. मात्र, नंतर घडलेल्या प्रचंड घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपच्या गळाला लागले आणि थेट उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी ऑपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे.