शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra Government : भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 10:45 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला. आता महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. पण या सर्व घडामोडीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. फडणवीसांना शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यानं राज्यपालांवर टीकाही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या कलराज मिश्र यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणण्याची अटकळ बांधली जात आहे. राज्यातली सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपानं प्रतिमा संवर्धनासाठी हा खटाटोप चालवल्याचीही चर्चा आहे. मोदी सरकार लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  फडणवीसांना शनिवारी 23 रोजी सकाळीच राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, तसेच अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सगळ्याच प्रकारावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पहाटेच राष्ट्रपती राजवट हटवून फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यानं राज्यपालांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, परंतु न्यायालयानं त्यांची पाठराखण केली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांनी कोणत्याही अधिकारांचं अतिक्रमण केलेलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्यासही न्यायालयानं नकार दिला होता.  

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून, त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून केली जाते. भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून, भाजपाच्या वरिष्ठ नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली होती. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस