शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 05:21 IST

काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

मुंबई : काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस आमदारांनी स्वतंत्र गट करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांना मुंबईला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यानंतर सूत्रे हलले आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले.सोमवारी रात्री काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यास नकार दिल्यानंतर जयपूर येथे असलेल्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. काही आमदारांनी रात्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आम्ही वेगळा गट करायला तयार आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सरकार बनवा, असे सांगितल्याचे कळते.काँग्रेस आमदारांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे नेते रात्र उशिरा ‘सिल्व्हर ओक’वर जमले. तिथेची पुढची रणनिती ठरली. त्यानंतर सकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अनेक आमदारांनी फोन करून वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल अशी याची कल्पनाही त्यांना दिली.या घडामोडीनंतर सकाळी अकराच्या विमानाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे मुंबईला निघाले. ते विमानात असताना साडेबाराच्या सुमारास वेणुगोपाल यांनी ट्विट करून आम्ही चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटण्याकरता मुंबईत जात आहोत असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी आपली भूमिका बदलली, अशी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा