शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 05:21 IST

काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

मुंबई : काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस आमदारांनी स्वतंत्र गट करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांना मुंबईला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यानंतर सूत्रे हलले आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले.सोमवारी रात्री काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यास नकार दिल्यानंतर जयपूर येथे असलेल्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. काही आमदारांनी रात्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आम्ही वेगळा गट करायला तयार आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सरकार बनवा, असे सांगितल्याचे कळते.काँग्रेस आमदारांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे नेते रात्र उशिरा ‘सिल्व्हर ओक’वर जमले. तिथेची पुढची रणनिती ठरली. त्यानंतर सकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अनेक आमदारांनी फोन करून वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल अशी याची कल्पनाही त्यांना दिली.या घडामोडीनंतर सकाळी अकराच्या विमानाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे मुंबईला निघाले. ते विमानात असताना साडेबाराच्या सुमारास वेणुगोपाल यांनी ट्विट करून आम्ही चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटण्याकरता मुंबईत जात आहोत असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी आपली भूमिका बदलली, अशी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा