शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 05:21 IST

काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

मुंबई : काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस आमदारांनी स्वतंत्र गट करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांना मुंबईला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यानंतर सूत्रे हलले आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले.सोमवारी रात्री काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यास नकार दिल्यानंतर जयपूर येथे असलेल्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. काही आमदारांनी रात्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आम्ही वेगळा गट करायला तयार आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सरकार बनवा, असे सांगितल्याचे कळते.काँग्रेस आमदारांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे नेते रात्र उशिरा ‘सिल्व्हर ओक’वर जमले. तिथेची पुढची रणनिती ठरली. त्यानंतर सकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अनेक आमदारांनी फोन करून वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल अशी याची कल्पनाही त्यांना दिली.या घडामोडीनंतर सकाळी अकराच्या विमानाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे मुंबईला निघाले. ते विमानात असताना साडेबाराच्या सुमारास वेणुगोपाल यांनी ट्विट करून आम्ही चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटण्याकरता मुंबईत जात आहोत असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी आपली भूमिका बदलली, अशी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा