शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:27 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंना पक्षात घेतलं. साताऱ्यातून त्यांना निवडून आणायचं होतं. भाजपाने त्यांना निवडून आणायला पाहिजे होतं. शिवाजी महाराज यांच्यावर खरचं प्रेम आहे तर शिवेंद्रराजेंना मुख्यमंत्री करा. महापुरुषांच्या वारसदारांना घेऊन भाजपा सेक्युलर असल्याचा आव आणते. मात्र भाजपाची विचारधारा वेगळी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी हातात घेतली होती. प्रत्येक उमेदवार एका अमोलची सभा द्या अशी मागणी करत होते असं अजित पवारांनी सांगितले. एका मुलाखतीत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अबकी बार २२० पार ही खोटी अपेक्षा होती. महाजनादेश, जनआशीर्वाद यात्रेला जितका प्रतिसाद मिळाला नाही त्याहून जास्त प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला मिळाला. कलम ३७० चा उल्लेख वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. त्याउलट आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी याचं वास्तव आम्ही मांडत होतो. ग्रामीण भागात भाजपाला फारसं यश मिळालं नाही हे सत्य आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान अनेकांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं. शिवस्वराज्य यात्रेत ग्रामीण भागातील प्रश्नाची नाळ जोडून लोकांच्या मुद्द्याला हात घालण्याचं काम केलं असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसविलं ही चीड लोकांच्या मनात होती. ती निकालात दिसली. भाजपाने शिवाजी महाराजांचा वापर २०१४ च्या निवडणुकीत केलं. मी स्वत: २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला मत दिलं होतं. भीमा-कोरेगाव प्रकरणात दोन जातींमध्ये विष पेरण्याचं काम काहींनी केलं. भारताचं संविधान जाळण्याचा प्रकार केला या घटनांमुळे सरकारविषयी चीड निर्माण झाली. ज्या भीमा कारेगाव येथे धार्मिक सलोखा होता त्याठिकाणी अशाप्रकारे कृत्य करण्याचं काम केलं. मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाला. गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या हाती असताना ते अपयशी ठरले. शेतकऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही याचाच राग मनात होता असा खुलासा अमोल मिटकरी यांनी केला. 

त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही, जर वाचला असता तर त्याची अंमलबजावणी केली असती. मला अनेक धमक्या येतात, तुमचा दाभोळकर करु वैगेरे, शिवाजी महाराज हे सर्वधर्मिय होते हेच मी मांडत आलोय. शिवसेना हळूहळू बदलते, २०२४ मध्ये भाजपा शिवसेनेला संपवणार, प्रबोधनकार, बाळासाहेबांचा ठाकरी बाणा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यात नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी शिवसेनेवर केली. 

दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मला राष्ट्रवादीने संधी दिली. मला अनेक पक्षांनी ऑफर दिल्या, शिवसेनेने, भाजपाने दिली. माझी विचारधारा मी शिवसेना-भाजपाच्या व्यासपीठावर मांडू शकत नाही. आरएसएसचं षडयंत्र असतं, बदनाम करणे, प्रकरणात अडकविणे, धमक्या देणे अन् नाहीच ऐकलं तर संपवून टाकायचं हे त्यांचे काम आहे असा आरोपही मिटकरी यांनी केला.    

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस