शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:27 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंना पक्षात घेतलं. साताऱ्यातून त्यांना निवडून आणायचं होतं. भाजपाने त्यांना निवडून आणायला पाहिजे होतं. शिवाजी महाराज यांच्यावर खरचं प्रेम आहे तर शिवेंद्रराजेंना मुख्यमंत्री करा. महापुरुषांच्या वारसदारांना घेऊन भाजपा सेक्युलर असल्याचा आव आणते. मात्र भाजपाची विचारधारा वेगळी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी हातात घेतली होती. प्रत्येक उमेदवार एका अमोलची सभा द्या अशी मागणी करत होते असं अजित पवारांनी सांगितले. एका मुलाखतीत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अबकी बार २२० पार ही खोटी अपेक्षा होती. महाजनादेश, जनआशीर्वाद यात्रेला जितका प्रतिसाद मिळाला नाही त्याहून जास्त प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला मिळाला. कलम ३७० चा उल्लेख वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. त्याउलट आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी याचं वास्तव आम्ही मांडत होतो. ग्रामीण भागात भाजपाला फारसं यश मिळालं नाही हे सत्य आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान अनेकांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं. शिवस्वराज्य यात्रेत ग्रामीण भागातील प्रश्नाची नाळ जोडून लोकांच्या मुद्द्याला हात घालण्याचं काम केलं असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसविलं ही चीड लोकांच्या मनात होती. ती निकालात दिसली. भाजपाने शिवाजी महाराजांचा वापर २०१४ च्या निवडणुकीत केलं. मी स्वत: २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला मत दिलं होतं. भीमा-कोरेगाव प्रकरणात दोन जातींमध्ये विष पेरण्याचं काम काहींनी केलं. भारताचं संविधान जाळण्याचा प्रकार केला या घटनांमुळे सरकारविषयी चीड निर्माण झाली. ज्या भीमा कारेगाव येथे धार्मिक सलोखा होता त्याठिकाणी अशाप्रकारे कृत्य करण्याचं काम केलं. मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाला. गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या हाती असताना ते अपयशी ठरले. शेतकऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही याचाच राग मनात होता असा खुलासा अमोल मिटकरी यांनी केला. 

त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही, जर वाचला असता तर त्याची अंमलबजावणी केली असती. मला अनेक धमक्या येतात, तुमचा दाभोळकर करु वैगेरे, शिवाजी महाराज हे सर्वधर्मिय होते हेच मी मांडत आलोय. शिवसेना हळूहळू बदलते, २०२४ मध्ये भाजपा शिवसेनेला संपवणार, प्रबोधनकार, बाळासाहेबांचा ठाकरी बाणा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यात नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी शिवसेनेवर केली. 

दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मला राष्ट्रवादीने संधी दिली. मला अनेक पक्षांनी ऑफर दिल्या, शिवसेनेने, भाजपाने दिली. माझी विचारधारा मी शिवसेना-भाजपाच्या व्यासपीठावर मांडू शकत नाही. आरएसएसचं षडयंत्र असतं, बदनाम करणे, प्रकरणात अडकविणे, धमक्या देणे अन् नाहीच ऐकलं तर संपवून टाकायचं हे त्यांचे काम आहे असा आरोपही मिटकरी यांनी केला.    

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस