शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 22:52 IST

काँग्रेसने झारखंडमधील भाजपचा पराभव योग्य म्हटला आहे, तर महाराष्ट्रातील भाजपच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर 2024) जाहीर झाले आहेत. महायुतीने महाराष्ट्रात नेत्रदीपक विजय नोंदवला आहे, तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीने बाजी मारली आहे. दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "लेव्हल प्लेइंग फील्ड" (समान संधी) ची परिस्थिती विस्कळीत झाल्याने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा पराभव केला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मोठा विजय कसा मिळाला, हा तपासाचा विषय आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान असे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे निष्पक्ष आणि संतुलित लढत होऊ शकली नाही, असा आरोपही काँग्रेसने केला. या निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले. तसेच, निवडणुकीत वापरलेली रणनीती आणि संसाधनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने 148 पैकी 132 जागा कशा जिंकल्या, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

विधानसभेत एवढा मोठा विजय कसा शक्य आहे?महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांची विधानसभा निकालांशी तुलना करताना काँग्रेसने म्हटले की, लोकसभेत भाजपचा पराभव केल्यानंतर विधानसभेत एवढा मोठा विजय कसा काय शक्य झाला? हा विरोधाभास पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, झारखंडमध्ये ध्रुवीकरणाचे राजकारण हरले आहे. तिथे आरएसएस आणि भाजपने आदिवासी भागाला प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न केला. हिमंता बिस्वा सरमाला तिथे पोस्टर बॉय बनवण्यात आले. पोस्टर बॉयने झारखंडमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे तेथील जनतेने भाजपला पूर्णत: नाकारले आणि काम करणाऱ्या सरकारला पुन्हा चांगल्या बहुमताने विजयी केले.

खेरा पुढे म्हणतात, महाराष्ट्रातील अनपेक्षित निकालांचा आम्ही विचार करत आहोत. भाजपने नरेंद्र मोदींच्या नावावर लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मते मागितली होती. त्यावेळी मतदारांनी भाजपचा पराभव केला. याच राज्याने भाजपला 4-5 महिन्यांच्या कालावधीत 148 पैकी 132 जागा दिल्या. हा कसला स्ट्राइक रेट आहे? हा स्ट्राइक रेट शक्य आहे का? आम्ही निवडणूक पारदर्शकतेचा विचार करत आहोत. 

दरम्यान, एकीकडे काँग्रेसने झारखंडमधील भाजपच्या पराभवावर फार बोलण्यास टाळले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विजयावर शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसने म्हटले की, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत निवडणूक प्रक्रिया आणि भाजपच्या निवडणूक प्रचार पद्धतींचा आढावा घेणार आहोत. पक्ष आणि आघाडी कुठे कमकुवत झाली आणि त्या जागांवर भाजपने आपली स्थिती कशी मजबूत केली, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

महायुतीचा निकालमहाराष्ट्रातील शेवटच्या अहवालानुसार, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही 41 जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपा