शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम 

By प्रविण मरगळे | Updated: November 17, 2019 16:08 IST

डॉ. अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर अद्यापही नावापुढे मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.

प्रविण मरगळे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे काळजीवाहू सरकारही बरखास्त झालं. देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावरुनही त्यांनी आपली ओळख बदलून महाराष्ट्र सेवक अशी केली. देवेंद्र फडणवीसांसोबत अन्य महत्वाचे मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, जयकुमार रावल यांनी ट्विटरवरील नावात बदल केला आहे. 

मात्र राज्यातील माजी कृषीमंत्री असलेले डॉ. अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर अद्यापही नावापुढे मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होत नाही त्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट सुरु असल्याने राज्याचा कारभार राज्यपालांच्या अधिपत्याखाली गेलेला आहे. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल काम सांभाळत आहेत. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी कृषीमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. कदाचित कृषीमंत्र्यांना माहित नसेल राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. अनिल बोंडे यांना माहित नसेल आपला पराभव झाला आहे. पराभवाच्या धक्क्यातून बोंडे सावरले नसतील. मंत्रिपद पुन्हा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा असल्याने हे अनिल बोंडे आणि सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवला आहे. मात्र याबाबत अनिल बोंडे यांना विचारले असता तात्काळ हे पद हटविण्याची सूचना संबंधितांना देतो असं सांगितले. 

राज्यातील या सत्तास्थापनेचा घोळ मुख्यमंत्रिपदावरुन झाला आहे. मागील ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्य कारभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार बनणार अशी अपेक्षा भाजपाला होती. मात्र शिवसेनेच्या मागणीमुळे भाजपाच्या सत्तास्थापनेचे स्वप्न भंगलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपाविला.

त्यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना कारभार पाहण्यास सांगितले. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रिपदही देवेंद्र फडणवीसांकडे राहिलं नाही. मात्र सत्तास्थापनेच्या घोळात ना कोणाचं सरकार बनलं ना कोणी मुख्यमंत्री झालं. त्यामुळे अखेर देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला महाराष्ट्र सेवक म्हणून संबोधित केलं आहे.  

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेSadabhau Khotसदाभाउ खोत Twitterट्विटरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019agricultureशेतीministerमंत्री