शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:51 IST

Maharashtra News : गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे.

नागपूर - सर्व माणसांना माहित आहे की, निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपणचं नष्ट होऊ. पण निसर्गाची हानी करण्याचं काम थांबताना दिसत नाही. तसेच आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, तरीही आपापसतील भांडण मिटविण्याचं काम होत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. मात्र या वक्तव्याचा अर्थ काढला तर सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे. मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपावर होता अशी चर्चा सुरु आहे. 

यावेळी मोहन भागवत म्हणाले की, स्वार्थ खूप वाईट गोष्ट आहे हे सर्वांना माहित आहे, पण काही मोजकेच लोक असतात जे स्वार्थ सोडतात. यामध्ये देशाचं उदाहरण घ्या किंवा व्यक्तीचं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे कान टोचण्याचं काम केलं आहे. 

त्याचसोबत शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता येईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले.  

राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षातील संवाद तुटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली. एनडीएच्या बैठकीचं आमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही या सगळ्या परिस्थितीवरुन मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून भाजपा-शिवसेना यांचे संबंध ताणले गेले आहेत. सत्तेच्या वाट्यावरुन हे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान संघाने मध्यस्थी करावी अशी भूमिकाही भाजपाने घेतली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने संघानेही या संघर्षात न पडणं पसंत केलं. त्यामुळे मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपाकडेच होता हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं.   

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019