शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:51 IST

Maharashtra News : गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे.

नागपूर - सर्व माणसांना माहित आहे की, निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपणचं नष्ट होऊ. पण निसर्गाची हानी करण्याचं काम थांबताना दिसत नाही. तसेच आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, तरीही आपापसतील भांडण मिटविण्याचं काम होत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. मात्र या वक्तव्याचा अर्थ काढला तर सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे. मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपावर होता अशी चर्चा सुरु आहे. 

यावेळी मोहन भागवत म्हणाले की, स्वार्थ खूप वाईट गोष्ट आहे हे सर्वांना माहित आहे, पण काही मोजकेच लोक असतात जे स्वार्थ सोडतात. यामध्ये देशाचं उदाहरण घ्या किंवा व्यक्तीचं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे कान टोचण्याचं काम केलं आहे. 

त्याचसोबत शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता येईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले.  

राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षातील संवाद तुटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली. एनडीएच्या बैठकीचं आमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही या सगळ्या परिस्थितीवरुन मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून भाजपा-शिवसेना यांचे संबंध ताणले गेले आहेत. सत्तेच्या वाट्यावरुन हे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान संघाने मध्यस्थी करावी अशी भूमिकाही भाजपाने घेतली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने संघानेही या संघर्षात न पडणं पसंत केलं. त्यामुळे मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपाकडेच होता हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं.   

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019