शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:51 IST

Maharashtra News : गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे.

नागपूर - सर्व माणसांना माहित आहे की, निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपणचं नष्ट होऊ. पण निसर्गाची हानी करण्याचं काम थांबताना दिसत नाही. तसेच आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, तरीही आपापसतील भांडण मिटविण्याचं काम होत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. मात्र या वक्तव्याचा अर्थ काढला तर सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे. मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपावर होता अशी चर्चा सुरु आहे. 

यावेळी मोहन भागवत म्हणाले की, स्वार्थ खूप वाईट गोष्ट आहे हे सर्वांना माहित आहे, पण काही मोजकेच लोक असतात जे स्वार्थ सोडतात. यामध्ये देशाचं उदाहरण घ्या किंवा व्यक्तीचं असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे कान टोचण्याचं काम केलं आहे. 

त्याचसोबत शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. मात्र, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता येईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले.  

राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षातील संवाद तुटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. शिवसेना खासदारांची जागा विरोधी बाकांवर केली. एनडीएच्या बैठकीचं आमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नाही या सगळ्या परिस्थितीवरुन मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून भाजपा-शिवसेना यांचे संबंध ताणले गेले आहेत. सत्तेच्या वाट्यावरुन हे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान संघाने मध्यस्थी करावी अशी भूमिकाही भाजपाने घेतली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने संघानेही या संघर्षात न पडणं पसंत केलं. त्यामुळे मोहन भागवत यांचा रोख शिवसेना-भाजपाकडेच होता हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं.   

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019