शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Government: कोणत्याही परिस्थितीत त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 05:11 IST

भाजप आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले, ते पहाता त्यांना कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करता येणार नाही.

मुंबई : भाजप आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले, ते पहाता त्यांना कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यांच्याकडे तेवढे आमदार नाहीत, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीव्यक्त केला. तसेच अजित पवार यांची ही कृती बेशिस्तभंगाची असून पक्ष त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील सकाळच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुुक्त पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले, बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे. शिवसेनेचे ५६ राष्ट्रवादीचे ५४ काँग्रेसचे ४४ असे १५६ तर मित्र पक्षाचे मिळून आमच्याकडे १६९ ते १७० आमदार आहेत. भाजपकडे एवढी संख्या नाही. त्यामुळे सरकार बनवण्याची आम्ही तयारी केली होती. मात्र काल रात्रीच्या बैठकीनंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कार्यतत्परता दाखवली, ते पाहून मला समाधान वाटले, असा टोलाही पवार यांनी लगावला.अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात आहे. शिस्तभंगाच्या व्याख्येत बसणारा आहे. विधिमंडळाचे सदस्य असो अथवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, कोणीही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, अशा शब्दात पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे सदस्य गेले किंवा जाणार असतील, त्यांना आपल्या देशात पक्षांतर बंदीचा कायदा असल्याची जाणीव आहे. त्यांचे सदस्यत्व जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जनमानसात भाजपच्या विरोधात आहे, ते पाहता जे लोक पक्ष सोडून जातील त्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळणार नाही. पुन्हा जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे नेते मिळून त्या उमेदवाराच्या विरोधात सर्व शक्ती लावतील. त्यांना पराभूत करतील असेही पवार यावेळी म्हणाले. पक्ष सोडून जातील त्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळणार नाही. पुन्हा जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते मिळून त्या उमेदवाराच्या विरोधात सर्व शक्ती लावतील, आणि त्यांना पराभूत करतील असेही पवार यावेळी म्हणाले.या पत्रकार परिषदेत आमदार राजेंद्र शिंगणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा यांना हजर केले. तिघांनीही त्यांना कसे चुकीची माहिती देऊन राजभवनावर नेण्यात आले, याची कहाणी सांगितली. हा सूर्य हा जयद्रथ या नात्याने पवार यांनी पत्रकार परिषदेत खरेखोटे करण्याचा प्रयत्न केला.‘ते’ पत्र बैठकीचे होते!राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सदस्यांची यादी तयार केली होती. या यादीवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ही यादी बैठकीच्या वेळी तयार केली होती. मंडळाचे नेते म्हणून ही यादी त्यांच्याकडे होती. अंतर्गत कारणासाठी सह्या घेण्यात आल्या होत्या. त्या ५४ जणांच्या पाठिंब्याची यादी म्हणून त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय? आणि राज्यपालांची फसवणूक केली का असा प्रश्न आपल्यासमोर आहे असेही पवार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस