शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:40 IST

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली.

मुंबई - गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपाच्या या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक असून, त्यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या 59 उमेदवारांची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. तसेच या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण 164 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 105 जागांवर आम्हाला विजय मिळाला. तर 59 जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यापैकी काही जागांवर अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला. आज या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तिथे या पराभवाच्या कारण्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली. त्यांनी आता आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या उमेदवारांनी कामाला सुरुवात केली आहे.'' ''या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पराभूत आमदारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास उपस्थित त्यांनी पराभूत उमेदवारांनी दिला. तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांना राजकीय बळ मिळावे यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनेत सामावून घेण्यात येणार आहे,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019