शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दहा वर्षांचा पाऊस ‘तपासून’ वाजला ९२ परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 05:38 IST

९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई : ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. ओबीसी आरक्षणाशिवायच ही निवडणूक होणार आहे. मात्र, १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय या आरक्षणाबाबत काय निर्णय देते, त्यावर या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळणार की नाही, हे निश्चित होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा समर्पित आयोगाने शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे हा डाटा सोपविला. आता १२ जुलैच्या सुनावणीपूर्वी सरकार हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करेल आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण बहाल करण्याची विनंती करेल. 

१७ जिल्ह्यांतील पालिकांची निवडणूकपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलडाणा.

निवडणुकीचा कार्यक्रमउमेदवारी अर्ज भरणे : २२ ते २८ जुलै (२३, २४ जुलै वगळून)अर्जांची छाननी : २९ जुलैअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ ऑगस्ट मतदान : १८ ऑगस्ट मतमोजणी, निकाल : १९ ऑगस्ट

धनुष्यबाणाचे काय होणार? या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला, याबाबत उत्सुकता असेल. दोन्ही गट धनुष्यबाणावर दावा करण्याची शक्यता आहे. 

कसोटी शिंदे-भाजप अन् मविआचीहीएकनाथ शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सत्तेतील नव्या युतीची मोठी कसोटी लागणार आहे. महाविकास आघाडी सत्तेतून गेल्यानंतरही अभेद्य राहणार का, हेही स्पष्ट होईल. 

पावसाच्या आकडेवारीवर निर्णयराज्यात २०० हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पण, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जास्त पाऊस नसेल अशाच नगर परिषदांच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यासाठी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि दहा वर्षांतील पावसाच्या सरासरीचा अभ्यास करूनच आयोगाने हा निर्णय घेतला.

नव्या सरकारसमोर आरक्षणाचे आव्हानओबीसी आरक्षणाचा सातत्याने आग्रह धरणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ओबीसी आरक्षण हे १८ ऑगस्टला होणाऱ्या ९२ नगर परिषदा व चार नगर पंचायतींच्या निवडणुकीत बहाल करण्याचे आव्हान असेल. 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही निवडणूक घेऊ नये. राज्य सरकारने त्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र