शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दहा वर्षांचा पाऊस ‘तपासून’ वाजला ९२ परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 05:38 IST

९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई : ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. ओबीसी आरक्षणाशिवायच ही निवडणूक होणार आहे. मात्र, १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय या आरक्षणाबाबत काय निर्णय देते, त्यावर या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळणार की नाही, हे निश्चित होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा समर्पित आयोगाने शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे हा डाटा सोपविला. आता १२ जुलैच्या सुनावणीपूर्वी सरकार हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करेल आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण बहाल करण्याची विनंती करेल. 

१७ जिल्ह्यांतील पालिकांची निवडणूकपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलडाणा.

निवडणुकीचा कार्यक्रमउमेदवारी अर्ज भरणे : २२ ते २८ जुलै (२३, २४ जुलै वगळून)अर्जांची छाननी : २९ जुलैअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ ऑगस्ट मतदान : १८ ऑगस्ट मतमोजणी, निकाल : १९ ऑगस्ट

धनुष्यबाणाचे काय होणार? या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला, याबाबत उत्सुकता असेल. दोन्ही गट धनुष्यबाणावर दावा करण्याची शक्यता आहे. 

कसोटी शिंदे-भाजप अन् मविआचीहीएकनाथ शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सत्तेतील नव्या युतीची मोठी कसोटी लागणार आहे. महाविकास आघाडी सत्तेतून गेल्यानंतरही अभेद्य राहणार का, हेही स्पष्ट होईल. 

पावसाच्या आकडेवारीवर निर्णयराज्यात २०० हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पण, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जास्त पाऊस नसेल अशाच नगर परिषदांच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यासाठी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि दहा वर्षांतील पावसाच्या सरासरीचा अभ्यास करूनच आयोगाने हा निर्णय घेतला.

नव्या सरकारसमोर आरक्षणाचे आव्हानओबीसी आरक्षणाचा सातत्याने आग्रह धरणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ओबीसी आरक्षण हे १८ ऑगस्टला होणाऱ्या ९२ नगर परिषदा व चार नगर पंचायतींच्या निवडणुकीत बहाल करण्याचे आव्हान असेल. 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही निवडणूक घेऊ नये. राज्य सरकारने त्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र