शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:26 IST

एकही आंबेडकरी बौद्ध भाजपाच्या दिशेने वळणार नाही. बौद्ध भाजपाच्या प्रचाराला कधीही बळी पडणार नाही असा विश्वास राजरत्न आंबेडकरांनी व्यक्त केला. 

छत्रपती संभाजीनगर - आम्ही पाडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. मराठा, धनगर, मुस्लीम, बौद्ध, लिंगायत, मातंग, माळी समाजाला एकत्रित करून त्यांना आवाहन करतोय. महायुती, महाविकास आघाडी हे जे पक्षीय राजकारण आहे त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खरे प्रतिनिधी विधानसभेत पाठवले पाहिजेत. ज्यादिवशी समाज आमचा मित्र होईल तेव्हा हा राजकीय खेळखंडोबा थांबेल. महाराष्ट्राचा खरा आवाज विधानसभेत पाठवायचा आहे. जर आम्हाला अपेक्षित निकाल आला तर मनोज जरांगे पाटील हे आमचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असं विधान भारतीय बौद्ध महासभा संघटनेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.

मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राजरत्न आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील स्वत:चे प्राण पणाला लावून लढतायेत. राज्यात जातीय सलोखा राहावा यासाठी आम्ही राज्यात दौरा करत आहोत. आता मराठवाड्यात आहे त्यानंतर विदर्भ दौऱ्यावर जावू. जरांगे लढतायेत तसं आम्हीही लढतोय. अनुसूचित जातीच्या २९ जागा त्यातल्या १५ जागा भाजपाने चोरल्यात. जी भाजपा आरक्षण आणि संविधान विरोधात बोलते, त्यांना आरक्षित जागांवर त्यांचा माणूस उभा करण्याचा नैतिक अधिकार आहे का? आमचा खरा प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचा आहे जो  समाजासाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल असा उमेदवार आम्ही पाठवणार आहोत. आमच्या बैठका ज्यांच्यासोबत आहेत त्यांचे कुठलेही पक्ष नाहीत. आम्ही राजकीय पक्षात उतरलो नाही. परंतु येणाऱ्या विधानसभेत आम्ही सगळे एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जावू असं चित्र आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे घोषणा करणार आहेत. नक्कीच आमची आशा आहे तेव्हा नवीन महाराष्ट्र यामाध्यमातून बघायला मिळेल. आमची ज्यापद्धतीने बोलणी सुरू आहेत. १२ तारखेला नक्की काय घोषणा होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. मराठा, धनगर, बौद्ध, माळी, मातंग सर्व समाजातील लोक आमच्यासोबत असतील. जर विधानसभेत आमचे प्रतिनिधी गेले तर ते मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडतील. नवीन शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध राहणार आहे. ज्याप्रकारे मंत्र्यांची मुले शिक्षण घेतायेत ते आमच्याही मुलांना मिळालं पाहिजे एकच शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात असलं पाहिजे. शेतीविषयक धोरण जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे ते लागू केले पाहिजे असं राजरत्न आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुती, मविआ यांच्याकडे राजकीय नैतिकता राहिलेली नाही. भाजपा-उद्धव ठाकरे एकत्र येत उद्या सरकार जरी स्थापन केले तरी महाराष्ट्राच्या जनतेला धक्का बसेल अशी परिस्थिती नाही. एका रात्रीत हे कधीही एकत्र होतील हे जनतेला वाटते. त्यामुळे हे जे नाटक या लोकांचे सुरू आहे ते बंद झाले पाहिजे. पक्षातील नेत्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले पाहिजेत. बौद्ध, मराठा, मुस्लीम कुणीही भाजपाला मतदान करणार नाही. किरण रिजिजू यांना महाराष्ट्रात फिरवण्याचा ते प्रयत्न करतील. आमच्या आंबेडकर कुटुंबातील १-२ सदस्य त्यांच्या गळाला लावण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरणार नाही. एकही आंबेडकरी बौद्ध भाजपाच्या दिशेने वळणार नाही. बौद्ध भाजपाच्या प्रचाराला कधीही बळी पडणार नाही असा विश्वास राजरत्न आंबेडकरांनी व्यक्त केला. 

जरांगे पाटलांविरोधातील आंदोलन 'सागर' बंगल्यावर नियंत्रित

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणखी एक आंदोलन सागर बंगल्याच्या इशाऱ्यावरून सुरू असते. आंदोलनकर्त्यांचे चरित्र्य काय हे टीव्हीवर पाहिले. मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावण्याचं काम सुरू आहे. आज दोन्ही समाज जागरुक झाला आहे. महाराष्ट्रात कुठेही दंगली होत नाहीत. सागर बंगल्यावरून ही आंदोलने नियंत्रित केली जातायेत असा आरोप करत राजरत्न आंबेडकरांनी आमचं तिसऱ्या आघाडीचं माहिती नाही, परंतु आज ज्यापद्धतीने आम्ही निकाल दिला तर आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील असा दावा केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४