शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:20 IST

Maharashtra Election 2024: उद्धव ठाकरेंची सावंतवाडीत राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा दावा केला. ठाकरे म्हणाले की, "माझे सरकार पाडले नसते, तर णी शेतकऱ्याना कधीच कर्जमाफी दिली असती."

शिवरायांचा पुतळा पडल्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाउद्धव ठाकरे यांनी यावेळी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपले इथले आमदार खाली मुंडी पाताळ धुंडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ते म्हणतात की, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगलं काय होणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की, कचरा? त्यातून काही चांगलं होणार नाही, पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

...तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती

मी ज्या काही गोष्टी आणू इच्छित होतो, त्या अजूनही का झाल्या नाहीत याचे उत्तर द्या. मल्टी स्पेशल हॉस्पिटलसाठी मी परवानगी दिली होती, पैसे देत होतो, पण ते अजूनही झाला आहे का? आपले सरकार आल्यानंतर मी तुम्हाला चांगले हॉस्पिटल देणार. मी 2019 मध्ये मुख्यमंत्री झालो, तेव्हा सर्वप्रथम रायगड किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी आणि शेतकरी कर्जमाफीसाठी निधी देण्याचे ठरवले होते. पण, माझे सरकार पाडले नसते, तर मी कधीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे