शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:31 IST

वाचाळवीरांना कंटाळून पक्षाच्या प्रवक्ते आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहे. 

नागपूर - ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख प्रा.शिल्पा बोडखे यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. आठ महिन्यांपूर्वीच शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत उद्धवसेनेतून बाहेर पडत शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला होता. महायुतीतील वाचाळवीरांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं कारण बोडखे यांनी सांगितले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पत्र सोपवलं आहे. 

शिल्पा बोडखे यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात भरपूर विकासात्मक काम करत आहेत. परंतु महायुती सरकार चालवताना तिन्ही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहोत. मात्र आपल्या सोबत असलेल्या पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुसऱ्यावर टीका करतात, कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावेल याचादेखील विचार करत नाहीत. खरेच आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवले जाते का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना विचारला आहे.

तसेच मीदेखील हिंदु आहे परंतु माझ्यावर झालेल्या संस्कारात प्रत्येकाचा आदर करणे, प्रत्येक समाजाचा सन्मान राखणे तसेच राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असू नये असं शिकवले आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, कित्येक दिवसांपासून असल्या वाचाळवीर नेत्याच्या वक्तव्याची चीड येते, त्यांच्या वक्तव्यामुळे तुम्ही केलेल्या कामाला कुठे तरी तडा जात आहे. वाचाळवीरांना आवर घालण्यापेक्षा त्यांचे नेते जलेबी सारखे घुमवत त्यांचे वक्तव्यांचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे अशा वातावरणात मला काम करण्याची मनापासून इच्छा होत नाही. त्यामुळे मी आपल्या शिवसेना प्रवक्ता आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे असं शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

ठाकरे गटावर काय केले होते आरोप?

शिंदेसेनेत प्रवेश करताना शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटावर आरोप केले होते, त्या म्हणाल्या होत्या की, उबाठा गटामध्ये महिला नेतृत्व उभे राहत असेल तर त्यांच्यावर आरोप लावणे, त्यांचे खच्चीकरण करणे. हा त्रास अडीच महिन्यांपासून दिला जात होता. विदर्भात वसुली गँग बसली आहे. जी महिला त्यांना पैसे कमावून देते तिला पक्षात उभं करायचं. जी प्रामाणिकपणे काम करते तिला त्रास द्यायचा. मला असाच त्रास दिला. पक्षप्रमुखांना मी सगळं सांगितलं पण त्यांनी मला न्याय दिला नाही. बाळासाहेबांची शिवसेना तिथे राहिली नाही. कुणीही आमची दखल घ्यायला आणि विचारायलाही तयार नव्हते. वारंवार अपमान सहन करत आपला आत्मसन्मान व स्वाभिमान आपल्याच पायदळी तुडवायचा का..??. उबाठामध्ये नेतृत्वाच्या आत्मसन्मानाला किंमत पण पदाधिका-यांचे आत्मसन्मान व स्वाभिमानाला काहीच महत्व नाही का..?? असा परखड सवाल उपस्थित करत शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटावर आरोप केले होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४