शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 09:08 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध मुद्द्यांवर भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपामध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. शिवसेना निम्म्या जागांसाठी आग्रही होती. मात्र अखेर शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय आणखी एका अर्थानं यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे घराण्यातील व्यक्ती उतरली आहे. आदित्य यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नसल्याचं उद्धव यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नाही, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला. भाजपा हे ऐकलं का, या प्रश्नाला त्यांनी माझं वचन आहे. ते मी पूर्ण करणार, असं उत्तर त्यांनी दिलं.भाजपाकडून सातत्यानं उपमुख्यमंत्रीपद देऊ, असं निवेदन देण्यात येत असल्याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. त्यावर बाळासाहेबांना वचन देण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचं उद्धव म्हणाले. कोणी ऐको न ऐको. हे वचन मी कोणाला विचारुन दिलेलं नाही. हे वचन मी माझं सर्वस्व, अर्थात माझे गुरू, माझे पिता, माझा नेता.. जे काही मी मानतो त्यांना दिलेलं हे वचन आहे आणि ते मी कोणाच्या परवानगीनं दिलेलं नाही. कुणाच्याही परवानगीवाचून ते अडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे