शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Maharashtra Election 2019: 'चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 19:24 IST

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. बँकांचे घोटाळे समोर येत आहेत. मात्र असं असूनही पंतप्रधान मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदीवरुन राहुल यांनी चांदिवतील प्रचारसभेत मोदींना लक्ष्य केलं. काँग्रेस नेते नसीम खान यांच्यासाठी राहुल चांदिवलीत आले होते. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकांना खूप आश्वासनं दिली होती. मात्र आज सर्वसामान्य जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'मोदी सरकारनं गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेचं कंबरडं मोडलं. काळा पैसा नष्ट करायचा असल्याचं सांगून मोदींनी नोटबंदी केली. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा होता, ते थेट देशाबाहेर पळून गेले. आज लहान उद्योग बंद होत आहेत. धारावीतील उद्योग संकटात. याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर कडाडून टीका केली. मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. मात्र त्यावरही भाष्य करत नाहीत. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. देशातल्या युवा पिढीला भविष्य दिसत नाही. मात्र मोदी देश फिरण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. 'जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचाच नाही. सरकार खरं बोलत नाही. आधी जगात देशाला मान होता. आज मात्र देशात गुंतवणूक येत नाही. व्यवसायिक देश सोडून जात आहेत. भाजप देशाला विभागण्याचे काम करत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी प्रचारसभेत मोदी सरकारवर बरसले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीDemonetisationनिश्चलनीकरणblack moneyब्लॅक मनी