शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 22:51 IST

मोदींमुळे केवळ मोजक्या उद्योगपतींचा विकास झाल्याची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार फक्त 15-20 उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. सर्वसामान्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून जनतेच्या खिशातील पैसा विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला. धारावी येथील 90 फूट रस्त्यावर आयोजित पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले,  नोटबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी,  अंबानी रांगेत उभे होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लघु, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील युनिट बंद पडत आहेत. मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंह टॅक्समुळे (जीएसटी) फायदा झालेला एकतरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का ? सरकारने अनेक कायदे बदलले. मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची अवस्था अशीच राहिली, तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बेरोजगार तरुण, शेतकरी, त्रासलेली जनता सरकारकडे न्याय मागत आहे त्यांना न्याय मिळाला नाही तर हा वर्ग सरकारकडून झगडून न्याय मिळवेल. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद मूठभर उद्योगपतींमध्ये नाही, तर सर्वसामान्य तरुण,  शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांच्यामध्ये आहे. त्यांच्या हातात घातलेली अडचणीची बेडी काढल्यास चमत्कार होईल. मात्र हे करण्याची विद्यमान सरकारची क्षमता नाही. हे काम काँग्रेसच करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. सरकारने कर्जमाफी केल्याचा दावा केला होता. मात्र तुमच्यापैकी कुणाचे कर्ज माफ झाले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कुणाचेही नाही असे उत्तर उपस्थितांमधून आले. पैसा गोरगरीबांचा व त्यातून अदानी,  अंबानी मौजमजा मारतात असा आरोप त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देण्याऐवजी लहान उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिल्यास अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्वसामान्य पुढे जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने देश पुढे जाईल. छोटे दुकानदार, लघु ,मध्यम उद्योजकांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हा प्रश्न मोदी नेहमी  विचारतात. पाच वर्षांत जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले. ते कॉंग्रेसने केले नाही असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. धारावी गरिबांची शक्ती आहे. प्रत्येक शहरात धारावी आहे. तुम्ही धारावीला समजू शकला नाहीत, तर देशाला समजू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था