शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

महाराष्ट्र निवडणूक 2019: तोडगा निघाला तरच शिवसेनेला पाठिंबा; जयंत पाटील यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:24 IST

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील

इस्लामपूर (जि. सांगली) : राजकारणात स्वप्न बघणे योग्य नाही. राजकारणात सर्व काही झाल्याशिवाय खरे मानायचे नाही. शिवसेनेला तत्त्वत: पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटचा ५० वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम आमदार पाटील व त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्याहस्ते झाला. पाटील म्हणाले, येथील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघता, आपले सरकार आल्याचा आनंद दिसतो आहे. मात्र सरकार नाही आले तरी दु:खी होण्याची गरज नाही. सक्षम विरोध करण्याएवढे संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे.राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळण्यासाठी अजून ८ ते १० दिवसांचा कालावधी लागेल. मंगळवारी मला दिल्लीला जावे लागणार आहे. तेथे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा होईल. शेवटी राजकारणातील निर्णय वरिष्ठ स्तरावर होतात, ते स्वीकारावे लागतात, असे सांगत आ. पाटील यांनी सरकार स्थापनेचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला....तरच पूर्ण एफआरपी देणे होईल शक्यएफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा धोकादायक आहे. एफआरपीसाठी कर्ज देण्याऐवजी केंद्र सरकारने साखरेला ३४ ते ३५ रुपयांचा दर दिला, तर बाजारातून पैसे मिळतील. त्यामुळे एफआरपीसाठी कर्ज काढावे लागणार नाही. यासाठी केंद्राकडे आग्रह धरला जाईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस