शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 21:25 IST

आर्थिक मंदी, बेरोजगार, शेतकरी आत्महत्यांवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

भिवंडी: देशातील आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आधी खासगी उद्योगांपर्यंत असलेलं संकट आता सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहे, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनीभाजपा सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकार ३० टक्के कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्यादेखील सुरक्षित नाहीत हे स्पष्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.राज ठाकरेंनी त्यांच्या भिवंडीतील सभेत आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीएमसी बँकेवरील संकटांवरुन सरकारवर तोफ डागली. खासगी नोकऱ्यांपाठोपाठ आता सरकारी नोकऱ्यादेखील जाणार आहेत. २०१४ मध्ये भाजपा विचारत होती, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता आम्ही त्यांना विचारतो, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या ५ वर्षांमध्ये १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र आपल्याला काहीच वाटत नाही. कारण आपण संवेदनाशून्य झालो आहोत, असं राज यांनी म्हटलं.तुम्ही तुमचा राग, संताप व्यक्त करत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. त्यामुळेच तुमचा संताप मतदानातून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी केलं. राज्यातील जनतेला कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळेच सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी मनसे समर्थपणे पाडेल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भिवंडी शहरातील प्रमुख समस्यांवर भाष्य केलं. भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही या भागात राहतातच कसे? तुम्हाला या परिस्थितीचा राग येत नाही का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थितांना विचारले.नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्ते खड्डेमुक्त होते. उत्तम काम करायचं ठरवल्यास ते होऊ शकतं. पण रस्त्यांच्या कंत्राटांमधून टक्के हवे असतील, तर मग रस्त्यांची कामं व्यवस्थित कशी काय होणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गुजरातमधली टोरंट कंपनी भिवंडीत अव्वाच्या सव्वा बिल आकारते. मात्र लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या भाषणाला ज्या टाळ्या वाजताहेत, तशीच एखादी टाळी टोरंट कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या गालावर वाजवली असती, तर परिस्थिती बदलली असती, असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा