शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 10:16 IST

५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. ज्यांनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार असा नारा दिला आज त्या पक्षाला महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपाला लगावला आहे. 

यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं. मात्र या दोघांच्या अहंकारामुळे राज्यात सत्तास्थापन होऊ शकले नाही. भाजपाचे सर्व नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची महत्वाची पदं स्वत:कडे हवीत. आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत, विचारांनी एकत्र आलो आहे, पदांसाठी नव्हे असं म्हणणारे मुख्यमंत्रिपदावर अडून आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक बहुजन नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी संपविले, तावडे, बावनकुळे, खडसे, पंकजा मुंडे यांना बाजूला सारलं गेलं. एसी-एसटीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पाहण्यासाठी केंद्रीय पथकही राज्यात आलं नाही. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तास्थापन होत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी इतकी महत्वकांक्षा का आहे? असा सवालही अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, तेल लावलेला पैलवान बिरुद मिरविलं, काँग्रेस-राष्ट्रवादी नावाला उरणार नाही अशा बाता मारल्या आज त्यांच्यावर दोन पैलवानांनी विजय मिळविला आहे. एक शरद पवार आणि दुसरी महाराष्ट्राची जनता यांनी दिलेल्या कौलमुळे आज त्यांना बॅगा भरुन नागपूरला येण्याची वेळ आली आहे अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. 

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना