शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 10:16 IST

५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. ज्यांनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार असा नारा दिला आज त्या पक्षाला महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपाला लगावला आहे. 

यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं. मात्र या दोघांच्या अहंकारामुळे राज्यात सत्तास्थापन होऊ शकले नाही. भाजपाचे सर्व नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची महत्वाची पदं स्वत:कडे हवीत. आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत, विचारांनी एकत्र आलो आहे, पदांसाठी नव्हे असं म्हणणारे मुख्यमंत्रिपदावर अडून आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक बहुजन नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी संपविले, तावडे, बावनकुळे, खडसे, पंकजा मुंडे यांना बाजूला सारलं गेलं. एसी-एसटीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पाहण्यासाठी केंद्रीय पथकही राज्यात आलं नाही. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तास्थापन होत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी इतकी महत्वकांक्षा का आहे? असा सवालही अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, तेल लावलेला पैलवान बिरुद मिरविलं, काँग्रेस-राष्ट्रवादी नावाला उरणार नाही अशा बाता मारल्या आज त्यांच्यावर दोन पैलवानांनी विजय मिळविला आहे. एक शरद पवार आणि दुसरी महाराष्ट्राची जनता यांनी दिलेल्या कौलमुळे आज त्यांना बॅगा भरुन नागपूरला येण्याची वेळ आली आहे अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. 

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना